भारताचा पहिल्या दिवसावर एकहाती कब्जा — बुमराहचा पंच, आफ्रिका नामोहरम

भारताचा पहिल्या दिवसावर एकहाती कब्जा — बुमराहचा पंच, आफ्रिका नामोहरम

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील कोलकात्यातील पहिल्या टेस्ट सामन्याचा पहिला दिवस भारताच्या दणदणीत वर्चस्वात संपला. दिवसअखेर भारताने १ विकेट गमावून ३७ धावा केल्या आहेत. के. एल. राहुल १३ आणि वॉशिंग्टन सुंदर ६ धावांवर नाबाद आहेत. एकमेव विकेट यशस्वी जैस्वालचे (१२) पडले.

दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात – १५९ वर ऑलआउट

टॉस जिंकून टेंबा बावुमा यांनी प्रथम फलंदाजी घेतली. मार्कराम–रिक्ल्टन जोडीने ५७ धावांची चांगली सुरुवात दिली. मात्र या जोडीच्या विभक्तीनंतर आफ्रिकेची फलंदाजी कोसळली आणि संपूर्ण संघ ५५ षटकांत १५९ धावांवर आटोपला.

दक्षिण आफ्रिकेची प्रमुख धावा:

बुमराहचा ‘पंजा’ — आफ्रिकेला गारठवले

भारतासाठी सर्वात मोठा नायक ठरला जसप्रीत बुमराह.
त्याने १४ षटकांत २७ धावांत ५ बळी घेतले.
हा त्याच्या टेस्ट करिअरमधील १६वा पाच बळींचा पराक्रम आहे.

इतर गोलंदाज:

भारताची फलंदाजी — शांत, संयमी सुरुवात

भारतासाठी यशस्वी जायसवाल आणि राहुलने डावाची सुरुवात केली. जायसवाल आक्रमक दिसला, पण १२ धावा करून बोल्ड झाला. मार्को जान्सनने त्याला बाद केले.

राहुल–सुंदर यांनी १९ धावांची सावध भागीदारी केली आहे.
भारत अजूनही दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावापेक्षा १२२ धावांनी मागे आहे.

Exit mobile version