31 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषट्विटर पोलवरही काँग्रेसचा घोटाळा! बोगस मतदानातून जिंकला पोल

ट्विटर पोलवरही काँग्रेसचा घोटाळा! बोगस मतदानातून जिंकला पोल

Google News Follow

Related

भारतीय निवडणुकांच्या इतिहासात आजवर बोगस मतदानाची अनेक उदाहरणे पाहण्यात आली आहेत. पण आता ट्विटरवर घेण्यात आलेल्या पोलमध्येही बोगस मतदानातून पोल जिंकल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस पक्षाने हा नवा घोटाळा केला आहे.

नेमके काय घडले?
टाइम्स ऑफ इंडिया च्या पत्रकार रिचा पिंटो यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक एक पोल घेतला. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये कोणता पक्ष सत्ता काबीज करेल असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यासोबत शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चार पर्याय दिले होते.

नेटकऱ्यांनी वाटणाऱ्या पक्षाच्या नावावर क्लिक करून आपले मत नोंदवले. या संपूर्ण पोलमध्ये एकूण ७३ हजार ३९७ मते पडली. यापैकी ६०.६ टक्के मते काँग्रेसला पडली. भाजपाला २६.३ टक्के मते पडली. शिवसेनेला १२.४ टक्के मते मिळाली तर ०.६ टक्के लोकांनी एनसीपी ला कौल दिला.

हे ही वाचा:

किरण माने प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री

‘भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ’

‘नानाभाऊ शारीरिक उंची असून चालत नाही, बौद्धिक उंची पण हवी’

गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या

या मतदानाची वेळ संपताना एकूण मतदान फक्त ३५ हजार २२३ इतके होते. ज्या मध्ये भारतीय जनता पार्टीला ४८ टक्के लोकांनी करून दिला होता. तर काँग्रेसला २६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. पण अवघ्या काही सेकंदात तब्बल ३८ हजार पेक्षा जास्त मते काँग्रेस पक्षाच्या बाजूने पडली. त्यामुळे ते या मतदानात विजयी ठरले. अवघ्या काही सेकंदात एवढी मते काँग्रेस पक्षाला कशी मिळाली याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. सोशल मीडिया एजन्सीजना हाताशी धरून काँग्रेसने हे बोगस मतदान घडवून आणल्याचा आरोप सध्या सोशल मीडियावरून केला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा