छांगुर बाबा यांच्यावर झालेल्या कारवाई आणि त्यांच्या कथित अवैध धर्मांतरण रॅकेटच्या उघडकीनंतर मुस्लिम धर्मगुरु मौलाना तौकीर रजा यांनी स्पष्टपणे सांगितलं की, जो माणूस फक्त लालचासाठी आपला धर्म सोडतो, तो आपल्या कुटुंबाचा कधीच होऊ शकत नाही. असे लोक तर देशालाही विकू शकतात. मौलाना म्हणाले की, “छांगुर बाबा बाबत मी फार पूर्वीपासून म्हणतो आहे की सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे मुसलमानांना खर्या मनानं इस्लामच्या मार्गावर चालवणं. आजचा मुसलमान केवळ नावाने मुसलमान आहे, त्याचं वर्तन, आचरण किंवा रूप काहीच खर्या मुसलमानासारखं नाही.”
ते पुढे म्हणाले की, “माझ्या दृष्टीने प्रेमाच्या नावाखाली, मुलगी असो वा मुलगा, किंवा लालच देऊन धर्म स्वीकारणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी यावर कडक बंदी घातली आहे. कोणी जर इस्लाम समजूनही धर्म स्वीकारायला आला, तरी मी आधी त्याला सांगतो की जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेऊनच या. मौलानांनी धर्मांतरासाठी देण्यात येणाऱ्या प्रलोभनांवर आणि कथित निधीपुरवठ्यावर कठोर टीका केली. त्यांनी स्पष्ट केलं की, कोणीही संघटना किंवा संस्था यासाठी निधी देत असल्याचा त्यांनी इन्कार केला. मात्र, काही व्यक्ती स्वतःच्या स्त्रोतांमधून किंवा अनुयायांकडून पैसा मिळवून हे करतात, असं शक्य आहे. पण नोकरी, पैसा किंवा इतर लालच देऊन धर्मांतर घडवणं हे पूर्णपणे अयोग्य आहे, असं ते म्हणाले.
हेही वाचा..
लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण : सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती
जन्म प्रमाणपत्र घोटाळा, मराठवाड्यात १२,९६५ जन्म प्रमाणपत्रे रद्द!
पुढील उपराष्ट्रपती जेडीयूचा नाहीतर भाजपाचा असेल!
पंतप्रधान मोदी ब्रिटनमध्ये पोहोचले, लंडनमध्ये जोरदार स्वागत!
“जो लालचासाठी आपला धर्म सोडू शकतो, तो आपल्या कुटुंबाचाही आणि देशाचाही खर्या अर्थाने होऊ शकत नाही,” असं मौलानांचं म्हणणं आहे. धर्मांतराचे प्रकार प्रेमप्रकरणाशी किंवा प्रलोभनाशी जोडले जात असल्याचं सांगून त्यांनी अशा प्रकारांवरही टीका केली. त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं उदाहरण देत सांगितलं की, अशा घटना खरं धर्मांतर नसून शरीयतचा गैरवापर आहेत आणि अशा गोष्टींची त्यांनी तीव्र शब्दांत निंदा केली.
छांगुर बाबा प्रकरणातील पीडितांच्या विधानांवर मौलाना तौकीर रजा यांनी शंका उपस्थित केली. ते म्हणाले की, अनेकदा असे दावे केले जातात की मुस्लिम मुलींना फसवून त्यांचं धर्मांतर करून हिंदू बनवलं जातं आणि त्यांच्या हिंदू मुलांशी लग्नं लावल्या जातात. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या प्रकरणांना जाणीवपूर्वक मोठं करून मांडलं जातं आणि मुसलमानांना बदनाम करण्यासाठी हिंदू भागांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातो.
त्यांनी असा प्रश्नही उपस्थित केला की, अशा घटना फक्त उत्तर प्रदेशातच का उघड होतात? इतर राज्यांमध्ये का नाही? तौकीर रजा यांचा आरोप आहे की, प्रसारमाध्यमं आणि सरकार एकतर्फी पद्धतीनं कारवाई करत आहेत. त्यांच्या मते, जर एखादा मुस्लिम चुकीच्या कामात सापडला, तर लगेच त्याला आयएसआयसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी जोडून टाकलं जातं, जे पक्षपातीपणाचं लक्षण आहे.
ते म्हणाले की, जर एखादा मुस्लिम तरुण हिंदू मुलीशी लग्न करतो, तर तो स्वतःच्या धर्मातील मुलीवर अन्याय करतो. अशा लग्नांना मुस्लिम समाजात कोणतीही मान्यता नाही. शेवटी, त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना उद्देशून म्हटलं की, हिंदू तरुण जर मुस्लिम मुलींशी लग्न करत असतील, तर तेही आपल्या समाजाचा हक्क हिरावून घेत आहेत. “तुम्हाला वाटतं की फक्त मुसलमानांचं नुकसान होतं, पण प्रत्यक्षात हे हिंदू समाजाचं नुकसान आहे. बरेलीत हिंदू मुलीच्या धर्मांतर प्रकरणावर मौलानांनी म्हटलं की, “असे हजारो प्रकार मी बरेलीमध्ये दाखवू शकतो. जर कोणी एखाद्या व्यक्तीला फसवणूक करून त्याच्या प्रतिष्ठेशी खेळ केला, तर अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केलीच पाहिजे.”







