पाऊस, पूर अन् भूस्खलनाने हिमाचल बेहाल; १५७ बळी, २५९ रस्ते बंद

भूस्खलन, पुरामुळे सुमारे ८८६ कोटींचे नुकसान

पाऊस, पूर अन् भूस्खलनाने हिमाचल बेहाल; १५७ बळी, २५९ रस्ते बंद

हिमाचल प्रदेशात मान्सूनचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्य आपत्कालीन संचालन केंद्राच्या (SEOC) ताज्या अहवालानुसार, ३० जून ते ९ ऑगस्ट या कालावधीत पावसाशी संबंधित घटनांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील २५९ रस्ते बंद असून, सुमारे ९०० मालमत्ता आणि सार्वजनिक बांधकामांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अंदाज सुमारे ८८६ कोटी रुपये इतका आहे.

अहवालानुसार, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुराच्या घटनांमध्ये ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रस्ते अपघातांमध्ये ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. या नैसर्गिक आपत्ती आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये सुमारे २५७ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

मुसळधार पावसाचा परिणाम राज्यातील वीजपुरवठ्यावरही झाला आहे. कुल्लू आणि मंडी हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. राज्यातील सुमारे १६१ डीटीआर आठवडाभरापासून बंद आहेत. यामध्ये मंडी जिल्ह्यात सर्वाधिक ७७ डीटीआर बंद आहेत. त्यानंतर शिमला जिल्ह्यात ४३, तर कुल्लू जिल्ह्यात ४० डीटीआर कार्यरत नसल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यदिनासाठी दिल्लीत हाय अलर्ट, १९ दहशतावाद्यांचे पोस्टर्स जारी

इराणच्या धमकीने ट्रम्प सतर्क; केटरिंग ट्रक ठरला ‘सीक्रेट एस्केप प्लॅन’

धारावीत आई-वडिलांनीच दीड वर्षांच्या बाळाला १ लाख ५ हजारांत विकले!

ब्लिंकइटच्या गोदामात झुरळेच झुरळे; परवाना रद्द

दरम्यान, सततच्या पावसामुळे भूस्खलनाच्या घटना सुरूच असून, अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्ते आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्यासमोर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

Exit mobile version