26 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषभारताला ऑलिंपिकमध्ये २१ पदकांची अपेक्षा

भारताला ऑलिंपिकमध्ये २१ पदकांची अपेक्षा

Google News Follow

Related

टोकियोमध्ये ऑलिंपिक स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेमध्ये भारत सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास देशातील ऑलिंपिक समितीकडून व्यक्त केला जात आहे. असोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार संभाव्य पदकविजेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या भाकितानुसार भारताला एकूण २१ पदकं मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ऑलिंपिक स्पर्धेमध्ये यंदा भारताला अनेक पदकांची अपेक्षा आहे. ऑलिंपिक समितीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारत २१ पदकं जिंकेल असे सांगितले जात आहे. यामध्ये एकूण ५ सुवर्ण, पाच रौप्य आणि ११ कांस्य अशी एकूण २१ पदकं कमावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

केरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही

लखनौ विद्यापीठात विद्यार्थी गिरवणार सावरकरांच्या विचारांचे धडे

ठाणे जिल्ह्यात वाहून गेलेल्या पाचपैकी एकाचा मृत्यू 

बापरे! कळव्यात दरड कोसळली; एकाच घरातील पाच जण दगावले

या संभाव्य यादीत अनेक खेळाडूंची नावे आहेत. या यादीनुसार भारताची नेमबाजीत सर्वोत्तम कामगिरी राहिल. हा अंदाज खरा मानल्यास नेमबाजीतून भारताला ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ कांस्य पदके मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. त्याबरोबरच भारताला तिरंदाजी आणि बॉक्सिंगमध्ये देखील पदके मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या अंदाजानुसार भारताला बॅडमिंटनमध्ये धक्का बसणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताची बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधु हिला कोणतेही पदक मिळणार नसल्याचे भाकित व्यक्त केले आहे. तर नीरज चोप्राकडून भालाफेकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, परंतु तो संभाव्य पदक विजेत्यांच्या यादीत नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा