भारत-ब्रिटन करारामुळे राज्याच्या पिकाला व परंपरेला जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली!

मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

भारत-ब्रिटन करारामुळे राज्याच्या पिकाला व परंपरेला जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली!

भारत आणि ब्रिटनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून अधूनमधून वाटाघाटी सुरू असलेल्या मुक्त व्यापार कराराला (FTA) अखेर गुरुवारी (२४ जुलै) मान्यता देण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि ब्रिटिश समकक्ष केयर स्टार्मर यांच्यात लंडनमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर या करारावर स्वाक्षरी झाली. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा करार केवळ आर्थिक भागीदारी नाही तर सामायिक समृद्धीची योजना आहे. भारतीय कापड, पादत्राणे, रत्ने आणि दागिने, समुद्री खाद्य आणि अभियांत्रिकी उत्पादनांना ब्रिटनमध्ये चांगला प्रवेश मिळेल. भारताच्या कृषी उत्पादनांसाठी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उद्योगासाठी ब्रिटिश बाजारपेठेत चांगल्या संधी उपलब्ध होतील.”

“हा करार भारतातील शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई क्षेत्रासाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. दुसरीकडे, वैद्यकीय उपकरणे आणि एरोस्पेस पार्ट्स यांसारखी यूकेमध्ये बनवलेली उत्पादने भारतातील लोकांना आणि उद्योगांना परवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध असतील.”

दरम्यान, भारत-ब्रिटन व्यापार करारामुळे राज्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. करारामुळे राज्याच्या पिकाला व परंपरेला जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्वीटकरत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा दूरदर्शी करार महाराष्ट्रातील शेतकरी व कारागिरांसाठी नवे जागतिक दारे खुली करतो. ऐतिहासिक भारत-युके मुक्त व्यापार करारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या दूरदर्शी करारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि कारागिरांना जागतिक व्यासपीठ मिळणार आहे.
हे ही वाचा : 
भाजी असो की रस, दुधीच्या गुणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही
वायूरूपात विराजमान शिवलिंगाला पूजारीही करत नाहीत स्पर्श
व्यस्त वेळापत्रकातही आरोग्याची कशी काळजी घेतात अभिषेक मलिक?
त्यांचा शो पाहत मोठी झाले, आजही गाणं ऐकून भावूक होते

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंबा, द्राक्षे, फणस, बाजरी आणि सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या निर्यातीतून फायदा मिळणार,  हळद, मिरी आणि वेलदोडा यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि चांगला नफा मिळणार, कोल्हापुरी चपला व चर्मउद्योगाला ‘झिरो ड्युटी’मुळे जागतिक बाजारपेठ आणि कोल्हापूरसारख्या MSME केंद्रांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बळ प्राप्त होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हा दूरदर्शी करार महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि परंपरागत उद्योगांना नवी दिशा देईल. महाराष्ट्राच्या शेतकरी आणि कारागिरांना जागतिक व्यासपीठावर सन्मान मिळवून दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version