भारतीय उच्चायुक्तांनी घेतली बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट

भारत-बांगलादेश तणावात राजनैतिक हालचाली

भारतीय उच्चायुक्तांनी घेतली बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट

भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी सोमवारी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट घेतली. दोन शेजारी देशांमधील ही महत्त्वपूर्ण भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ऑनलाइन संबोधनानंतर भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक संबंधांमध्ये तणाव वाढला आहे.

उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी रविवारी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री खलीलुर रहमान यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली होती. ते सोमवारी झालेल्या बैठकीलाही उपस्थित होते. भारतीय उच्चायुक्तांची परराष्ट्रमंत्र्यांसोबत झालेली भेटही महत्त्वाची मानली जात आहे. भारतात असलेल्या शेख हसीना यांच्या अलीकडील सार्वजनिक वक्तव्यांवरून ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे. यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने निषेध नोंदवत त्यांच्या वक्तव्यांचा निषेध केला. या घटनेमुळे बांगलादेशी जनतेच्या भावना दुखावल्या असून, भारत आणि बांगलादेशमधील सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये आणखी गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे मंत्रालयाने म्हटले.

रविवारी ढाका येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्रात मुलांसाठी विशेष जागेचे उद्घाटन केल्यानंतर त्रिवेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांची भेट होण्याची अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये थेट संवाद होणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.भारतीय उच्चायुक्त म्हणाले, “मला वाटते की जेव्हा दोन नेते एकमेकांना भेटतात, तेव्हा अनेक समस्या सुटतात. जेव्हा आपण एकमेकांशी संवाद साधतो, तेव्हा समस्यांवर तोडगा निघतो. मला पूर्ण विश्वास आहे की जनता आपल्या सोबत आहे आणि तोडगा नक्कीच निघेल… तो निघेल. मला पूर्ण विश्वास आहे. काहीही नकारात्मक नाही, सर्व काही सकारात्मक आहे.”

तारिक रहमान यांच्याबद्दल त्रिवेदी म्हणाले, “बांगलादेशचे पंतप्रधान… आम्ही सर्व त्यांचा खूप आदर करतो. मी त्यांची भाषणे अनेक वेळा ऐकली आहेत आणि ते मनापासून बोलतात. हे मी अनुभवले आहे. ते जनतेशी जोडलेले नेते आहेत. आमचे पंतप्रधानही जनतेशी जोडलेले आहेत.”

हे ही वाचा:

लष्करशी संबंधित गटाकडून काश्मिरी पंडितांना धमकी; कुटुंबांना लक्ष्य करण्याचा इशारा

लाल समुद्र ते हिंदी महासागर; भारतीय नौदलाने तेल टँकर्सना दिले ‘सुरक्षा कवच’!

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, वॉटर कॅननचा मारा

राहुल गांधी झारखंडच्या विद्यार्थ्यांना कधी भेट देणार?

दरम्यान 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे शेख हसीना यांच्या ऑनलाइन पत्रकार परिषदेनंतर ही राजनैतिक चर्चा झाली. 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. त्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हसीना यांनी हे संबोधन केले होते.

हसीना यांच्या संबोधनावर ढाका सरकारनेही तीव्र आक्षेप नोंदवला. आपल्या भाषणात हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याचा आणि लोकशाही पुनर्स्थापित करून देशाला ‘योग्य मार्गावर’ आणण्याचा आपला निर्णय कायम असल्याचे सांगितले. मात्र, बांगलादेशात परतल्यास आपल्याला तुरुंगवास किंवा मृत्युदंडाची शिक्षा होण्याचा धोका असल्याचेही त्यांनी मान्य केले.

Exit mobile version