तुर्कीयेच्या इनोनू विद्यापीठासोबतचा जेएनयूचा करार स्थगित

जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी दिली माहिती

तुर्कीयेच्या इनोनू विद्यापीठासोबतचा जेएनयूचा करार स्थगित

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून तुर्कीयेच्या इनोनू विद्यापीठासोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव, जेएनयू आणि इनोनू विद्यापीठ, तुर्की यांच्यातील सामंजस्य करार पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी गुरुवारी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेमुळे केंद्रीय विद्यापीठाने तुर्कीयेच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार (एमओयू) स्थगित केला आहे. प्रशासनाने दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या आणि भारताच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या देशाशी संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या की, “आमचे विविध देशांसोबत ९८ सामंजस्य करार आहेत. जेएनयूमध्ये तुर्की भाषा शिकवली जाते. प्रशासनाला वाटले की दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या आणि भारताच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या देशाशी आपण कोणतेही संबंध ठेवू नयेत. भारतीय सशस्त्र दलांसोबत उभे राहणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे कुलगुरू पंडित यांनी एएनआयला सांगितले.

“प्रत्येक नागरिक आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार आहे. जेएनयूला पूर्णपणे भारतीय करदात्यांकडून अनुदान दिले जाते. आपली निष्ठा भारतीय राज्याप्रती असावी. सध्याचे सशस्त्र आणि नौदल प्रमुख जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत. आम्ही त्यांना सलाम करतो. जेएनयू नेहमीच देशासाठी आणि आपल्या सशस्त्र दलांसाठी आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या.

हेही वाचा..

श्रीगंगानगर : सीमेपासून १५ किमी अंतरावर सापडले ड्रोन

डोळे बांधले, शिवीगाळ केली, सीमेवरील अधिकाऱ्यांबद्दल विचारले… बीएसएफ जवानाने सांगितला अनुभव

“युद्धबंदीसाठी पाकिस्तान पायात शेपूट घालून धावत होता!”

शाहबाज शरीफ यांच्याकडून पंतप्रधान मोदींची नक्कल; पसरूर लष्करी छावणीत सैनिकांची घेतली भेट

भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर बोलताना, पंडित यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णय घेण्याच्या शक्तीचे आणि राजकीय इच्छाशक्तीचे कौतुक केले. तसेच जगाला हवाई शक्ती दाखवण्याच्या भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाबद्दल बोलताना, जेएनयू कुलगुरू म्हणाल्या की भारत दीर्घकाळापासून दहशतवादाचा बळी आहे. यामध्ये पाकिस्तानचा पूर्णपणे सहभाग आहे. यात काही शंका नाही. भारत हा दहशतवादाचा सर्वात जास्त काळ बळी राहिला आहे. त्या दिवशी त्यांनी जे केले ते क्रूर होते आणि प्रत्येक सुसंस्कृत देशाने त्याचा निषेध केला पाहिजे. आनंद आहे की संयमाने आणि मर्जीने प्रत्युत्तर दिले.

Exit mobile version