राष्ट्रीय तपास यंत्रणेने जम्मू-काश्मीरच्या भटिंडी भागातील घुसखोरीशी संबंधित प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. बुधवारी सकाळी, जम्मूमध्ये १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. पाकिस्तानमधून भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. याआधीही जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रकरणांमध्ये NIA वेळोवेळी छापेमारी करत आली आहे. १३ डिसेंबर २०२४ रोजी NIA ने जम्मू-काश्मीरच्या विविध जिल्ह्यांसह एकूण १९ ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी रियासी, बडगाम, अनंतनाग आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये छापेमारी झाली होती.
NIA ने २१ नोव्हेंबर २०२४ रोजी देखील जम्मूतील अनेक भागांमध्ये छापेमारी केली होती. यामागील उद्देश पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळवणे हा होता. या कारवाईदरम्यान NIA ने पोलिस आणि निमलष्करी दल (CRPF) यांच्या मदतीने अनेक ठिकाणी छापेमारी केली होती.
हेही वाचा..
ट्रम्प- पुतिन यांच्यात दोन तास चर्चा; युद्धबंदीवर काय झाले बोलणे?
स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलचे यशस्वी लँडिंग; सुनीता विल्यम्स २८६ दिवसांनी पृथ्वीवर परतल्या
औरंग्याच्या कबरीच्या जागी धनाजी, संताजी, छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक उभारा
इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या सरकार प्रमुखासह अनेक उच्च अधिकारी ठार
याशिवाय, ५ ऑक्टोबर रोजी पाच राज्यांमधील २२ ठिकाणी दहशतवादी कट आणि टेरर फंडिंगच्या संशयावरून एकाच वेळी छापेमारी करण्यात आली होती. महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली येथे NIA ने ही कारवाई केली होती. हा छापा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणांवर केंद्रित होता. बारामुल्ला आणि इतर भागांमध्येही NIA ने छापे टाकले होते. बारामुल्लामध्ये मौलवी इकबाल भट यांच्या घरी सुरक्षा दलांच्या मदतीने तपासणी करण्यात आली होती.
NIA च्या या कारवाईपूर्वी, १ ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली होती. त्यादिवशी दक्षिण २४ परगणा, आसनसोल, हावडा, नदिया आणि कोलकाता येथे ११ ठिकाणी NIA ने छापे टाकले होते.







