31 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषमुख्तार अब्बास नकवी यांचा महागठबंधनवर हल्लाबोल

मुख्तार अब्बास नकवी यांचा महागठबंधनवर हल्लाबोल

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये बोलावलेल्या महागठबंधनाच्या बैठकीवर टीका केली आहे. त्यांनी या राजकीय हालचालींना “सामंती सत्तालोलुपतेचे राजकारण” असे संबोधले. नकवी म्हणाले, “सामंती सुलतानांचे सत्तेचे लालची शूरवीर सत्तासंघर्षाच्या शिखरावर पोहोचले आहेत. हे लोक भय आणि भ्रमाचे वातावरण निर्माण करून सत्ता मिळवू पाहत आहेत, परंतु बिहार आणि देशातील जनता आता अशा प्रकारच्या सामंती राजकारणाला स्वीकारणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “आजचं राजकारण हे पॅराशूटवरून नाही तर पायवाटेवरून चालत येतं. विरोधकांची ही घराणेशाहीची राजकीय परंपरा संपुष्टात येणार आहे. त्यांना भविष्यात काही स्थान उरणार नाही.” बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष तपासणी (एसआयआर) प्रक्रियेवर बोलताना नकवी म्हणाले, “निवडणूक आयोगाने आतापर्यंत १४ टक्के तपासणी पूर्ण केली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही प्रक्रिया पारदर्शक आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे, पण खोट्या मतदारांचे जाळेही संपवले पाहिजे.”

हेही वाचा..

टेकऑफवेळी पायलट स्विचेसमध्ये छेडछाड करत नाही

छप्पर फाडके : पंतप्रधान मोदींनी रोजगार मेळाव्यात दिली युवकांना नियुक्तीपत्रे

सोहागच्या हत्या प्रकरणानंतर ढाक्यात जनआक्रोश

एअर इंडिया विमान अपघात : एएआयबीकडून प्राथमिक अहवाल जारी

विरोधकांवर भ्रम पसरवण्याचा आरोप करताना त्यांनी म्हटले की, “ही सगळी त्यांच्या सत्तेच्या भुकेचं लक्षण आहे.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानांवर काँग्रेसने केलेल्या टीकेवर नकवी म्हणाले, “काँग्रेसला वाटतंय की त्यांच्या नशिबाने कधी तरी छप्पर फुटेल. पण ते भ्रमात जगत आहेत. त्यांचा देशावर किंवा जनतेवर विश्वास नाही, ते फक्त स्वतःच्या खुशफहमीमध्ये जगत आहेत. काँग्रेसवर टीका करताना नकवी म्हणाले, “त्यांची प्रतीक्षा यादी आता ओव्हरफ्लो झाली आहे, पण जनता त्यांना पुन्हा स्वीकारायला तयार नाही.”

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या ऑपरेशन सिंदूरवरील विधानाचे समर्थन करत नकवी म्हणाले, “आपल्या सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले. डोभाल यांनी जे म्हटलं, ते पूर्णपणे योग्य आहे. काही लोक आपल्या सैन्यापेक्षा पाकिस्तान व भारतविरोधी शक्तींवर अधिक विश्वास ठेवतात, जे अत्यंत दुर्दैवी आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५१,००० तरुणांना नियुक्ती पत्रे दिल्याबद्दल नकवी म्हणाले, “गेल्या ११ वर्षांत रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जागतिक आर्थिक मंदी असूनही भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे, ही मोठी उपलब्धी आहे. रोजगार मेळा हे त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा