नूर खान एअरबेसवर अमेरिकेचे नियंत्रण…पाक सुरक्षा तज्ज्ञाच्या दाव्यामुळे खळबळ

इम्तियाज गुल यांचे वक्तव्य व्हायरल

नूर खान एअरबेसवर अमेरिकेचे नियंत्रण…पाक सुरक्षा तज्ज्ञाच्या दाव्यामुळे खळबळ

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या जगभरात चर्चा सुरू असताना पाकिस्तानात रावळपिंडी स्थित नूर खान एअरबेसवर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर हा एअरबेस अमेरिकेच्या नियंत्रणात असल्याचा दावा एका सुरक्षा तज्ज्ञाने केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानातील सुरक्षा विश्लेषक इम्तियाज गुल यांनी केलेल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे वादळ उठले आहे. त्यांनी दावा केला आहे की, रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस अमेरिकेच्या नियंत्रणात आहे आणि पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तिथे हस्तक्षेप करण्याची परवानगी नाही.

गुल यांनी म्हटले की, “नूर खान एअरबेसवर अमेरिकेचा ताबा आहे. पाकिस्तान लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही तिथे जाऊ शकत नाहीत. त्यांनी असा आरोपही केला की या बेसवर अमेरिकन विमाने नियमितपणे उतरतात आणि त्यांच्या हालचालींबाबत पारदर्शकता नाही.

हा दावा अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील गुप्त लष्करी करार असण्याच्या शक्यतेकडे बोट दाखवतो आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतो.

हे ही वाचा:

अभिनेता दिनो मोरियाच्या घरावर ईडीची धाड!

सिंधू करार बंदीमुळे पाकचा घसा कोरडा, भारताला लिहिली चार पत्रे!

भारतीय रेल्वेने रचला इतिहास

छत्तीसगढ: १ कोटीचं बक्षीस असलेला नक्षली सुधाकर ठार! 

नूर खान एअरबेस का आहे महत्त्वाचा?

हा एअरबेस रावळपिंडीला लागून, इस्लामाबादपासून फक्त १० किमी अंतरावर आहे. येथे पाकिस्तानचे मुख्य हवाई वाहतूक तुकड्या (C-130, IL-78) तैनात आहेत.  हा बेस Strategic Plans Division च्या जवळ असून, तो पाकिस्तानच्या परमाणू शस्त्र नियंत्रण प्राधिकरणाचा मुख्य भाग मानला जातो. बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ, PAF कॉलेज चक्लाला, आणि फजाया इंटर कॉलेज यांच्यासोबत ही जागा शेअर केली जाते.

ऑपरेशन सिंदूर: भारताचा निशाणा

या पार्श्वभूमीवर, भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने या बेसवर हल्ला केला होता. हा हल्ला पाहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला, ज्यात २६ पर्यटक ठार झाले होते. पाकिस्तानच्या हवाई वाहतूक आणि लॉजिस्टिक नेटवर्कला धक्का देणे, पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाजवळचा ताण वाढवणे, परमाणू नियंत्रण केंद्राजवळचा संदेशवहनात्मक प्रभाव ही भारताची उद्दिष्टे या हल्ल्यानंतर सफल झाली होती.

Exit mobile version