30 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषमिशन सुदर्शन चक्र; पुढील १० वर्षात उभारणार भारताचे 'आयरन डोम'

मिशन सुदर्शन चक्र; पुढील १० वर्षात उभारणार भारताचे ‘आयरन डोम’

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला केले आश्वस्त

Google News Follow

Related

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने जबरदस्त कामगिरी केली. अशा संरक्षण प्रणालीची आवश्यकता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या १० वर्षात म्हणजे २०३५ पर्यंत देशात भगवान श्रीकृष्णापासून प्रेरणा घेत सुदर्शन चक्र मोहीम राबविण्यात येईल अशी घोषणा केली. देशातील नवयुवकांच्या साथीने ही यंत्रणा देशासाठी अभेद्य कवच म्हणून काम करेल अशा शब्दात पंतप्रधानांनी देशाला आश्वस्त केले. पंतप्रधान स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी “मिशन सुदर्शन चक्र” या अत्याधुनिक संरक्षण उपक्रमाची घोषणा केली, ज्याचा उद्देश भारताच्या सुरक्षेला अधिक बळकट करणे आहे. या मोहिमेचा उद्देश भारताच्या सामरिक, नागरी आणि धार्मिक ठिकाणांना शत्रूच्या संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षित ठेवण्यासाठी एक अभेद्य कवच निर्माण करणे आणि नव्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करणे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावला. त्यावेळी तब्बल १०३ मिनिटांचे आतापर्यंतचे सर्वात दीर्घ भाषण मोदींनी केले.

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून बोलताना मोदी म्हणाले की, देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांभोवती शक्तिशाली, बहुस्तरीय संरक्षण कवच तयार करण्यासाठी या प्रणालीमध्ये अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा समावेश असेल.

“पुढील दहा वर्षांत, २०३५ पर्यंत, हे राष्ट्रीय सुरक्षा कवच विस्तारावे, अधिक बळकट करावे आणि आधुनिक करावे, अशी माझी इच्छा आहे. भगवान श्रीकृष्णांपासून प्रेरणा घेऊन आम्ही सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे… राष्ट्र ‘सुदर्शन चक्र मिशन’ सुरू करणार आहे,” असे त्यांनी सांगितले. “संपूर्ण आधुनिक प्रणालीचे संशोधन, विकास आणि उत्पादन भारतातच व्हावे, आपल्या युवकांच्या प्रतिभेचा उपयोग करून. ही शक्तिशाली प्रणाली केवळ दहशतवादी हल्ले परतवणार नाही, तर दहशतवाद्यांवर प्रतिहल्लाही करेल,” असे ते म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, “भारत स्वतःची ‘आयरन डोम’सारखी संरक्षण प्रणाली विकसित करणार आहे, जी महत्त्वाच्या स्थळांचे, त्यात नागरी क्षेत्रांचाही समावेश आहे, संरक्षण करेल.”

हे ही वाचा:

लाल किल्ल्यावर राष्ट्राभिमानाचा झेंडा! पंतप्रधानांचा ऐतिहासिक सलामीचा क्षण

‘मोदी भिंतीसारखा उभा, शेतकऱ्यांशी तडजोड नाही’

‘गरिबी हटाव’ हे काँग्रेसचे लॉलिपॉप… गरिबी हटवली मोदींनीच

श्रीकृष्ण भक्तीत रंगणारी भोजपुरी गीते कोणती ?

नवीन प्रणाली इस्रायलच्या सुप्रसिद्ध ‘आयरन डोम’ला टक्कर देऊ शकते. ‘आयरन डोम’ ही हवाई हल्ले रोखण्यासाठी प्रसिद्ध असलेली बहूस्तरीय संरक्षण प्रणाली आहे. २०१० च्या दशकात तैनात झाल्यापासून तिने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि लेबनॉनच्या हिझबुल्लाहकडून डागण्यात आलेल्या हजारो रॉकेट्स अडवले आहेत. इस्रायलचा दावा आहे की, या प्रणालीचा यशाचा दर ९० टक्क्यांहून अधिक आहे.

मोदी यांच्या मते, मिशन सुदर्शन चक्र हे अत्याधुनिक देखरेख, क्षेपणास्त्रांना रोखणे (इंटरसेप्शन) आणि प्रतिआक्रमण क्षमतांचा संगम असेल, ज्यामुळे हवाई, भूप्रदेश आणि सागरी क्षेत्रातील धोके झपाट्याने निष्प्रभ करता येतील.

भारत-पाक संघर्ष
पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही घोषणा केली. ७ मे २०२५ रोजी पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. भारतीय सैन्याने नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानातील १३ लष्करी तळ व हवाई तळ उद्ध्वस्त केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा