33 C
Mumbai
Thursday, February 5, 2026
घरविशेषगोंडा अपघातावर राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक

गोंडा अपघातावर राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक

आर्थिक मदतीची घोषणा

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात रविवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, पंतप्रधानांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती निधीतून (PMNRF) मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘एक्स’वर लिहिले, “उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात वाहन अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे अत्यंत दुःखद वृत्त मिळाले. मी शोकसंतप्त कुटुंबीयांप्रती गहिरं शोक व्यक्त करते आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते.”

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ‘एक्स’वर लिहिले की, “उत्तर प्रदेशच्या गोंडा येथे झालेल्या भीषण अपघातामुळे मन अत्यंत दुःखी झाले आहे. या अपघातात आपले प्रियजन गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीप्रती संवेदना. जखमींना लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना. प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये देण्यात येणार आहेत. त्याआधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

हेही वाचा..

‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असे कोणाला म्हणाले राज पुरोहित

तरुण चुग यांनी राहुल गांधींना काय दिला टोला

२ रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे निधन

कुक दिलीपच्या नावाने बनावट अकाउंट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एक्स’वर लिहिले: “गोंडा जिल्ह्यातील दुर्दैवी रस्ते अपघात अत्यंत वेदनादायक व हृदयद्रावक आहे. माझ्या संवेदना शोकसंतप्त कुटुंबांसोबत आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. जिल्हा प्रशासनाला जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना करतो की मृतात्म्यांना सद्गती लाभो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो. जखमींना लवकरात लवकर बरे होवो.”

गोंडा जिल्ह्यात रविवारी एक बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन नहरामध्ये कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू, तर ४ जण जखमी झाले. देवीपाटन विभागाचे आयुक्त शशिभूषण यांनी ही माहिती दिली. गाडीमध्ये एकूण १५ प्रवासी होते, जे पृथ्वीनाथ मंदिरात जल अर्पण करण्यासाठी जात होते. ही मंडळी मोतीगंज पोलीस ठाणे हद्दीतील सीहागाव येथील रहिवासी होती. स्थानिकांनी सांगितले की, जोरदार आवाज झाल्याचे लक्षात येताच गावकरी घटनास्थळी धावले. तेव्हा बोलेरो गाडी पूर्णतः नहरामध्ये बुडालेली दिसली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि स्वतःही बचावकार्य सुरू केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा