26 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरविशेषत्या निष्पाप मृत्यूंना जबाबदार आरसीबीच!

त्या निष्पाप मृत्यूंना जबाबदार आरसीबीच!

Google News Follow

Related

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजय मिरवणुकीत झालेल्या भगदडप्रकरणी कर्नाटक सरकारने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात थेट आरसीबी मॅनेजमेंटला जबाबदार धरले आहे.

३ जून रोजी आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद मिळवल्यानंतर मोठा सोहळा आयोजित केला गेला होता. मात्र या कार्यक्रमासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती, असं सरकारच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

विराट कोहलीच्या व्हिडीओसह ‘फ्री एंट्री’ची जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर केली गेली, ज्यामुळे सुमारे ३ लाखांहून अधिक गर्दी जमली. पोलिसांनी आधीच परवानगी नाकारलेली असताना कार्यक्रम झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.

कार्यक्रमाच्या दिवशी ताशी ३:१४ वाजता आयोजकांनी अचानक प्रवेशासाठी पास लागेल अशी घोषणा केली. यामुळे मोठा गोंधळ, भीती आणि धावपळ सुरू झाली. प्रवेशद्वारे वेळेत उघडण्यात आली नाहीत, संयोजनात घोळ झाला आणि त्यामुळे भगदड झाली, असा ठपका सरकारने ठेवला आहे.

हेही वाचा:

सत्यजित रे यांचे मूळ घर सुरक्षित, तोडफोड झालेली नाही

सत्यजित रे यांचे मूळ घर सुरक्षित, तोडफोड झालेली नाही

गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात उदय सामंत यांची महत्त्वाची घोषणा

इस्रायलमध्ये राजकीय अस्थिरता वाढली

या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ७ पोलीस जखमी झाले. आरसीबी, डीएनए (आयोजक संस्था), आणि केएससीए (कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन) यांच्यात समन्वयाचा अभाव होता, हेही स्पष्ट करण्यात आलं.

सरकारने ही बाब गंभीर मानून न्यायालयात स्टेटस रिपोर्ट सादर केला असून, भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे होणारे प्राणहानीचे प्रसंग टाळण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा