जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांच्यासह अनेक नेत्यांवर विविध आरोप लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर, भाजपाने गुरुवारी प्रशांत किशोर यांच्यावर जोरदार पलटवार करत त्यांना आरसा दाखवला आहे. बिहार भाजपाचे मीडिया प्रमुख दानिश इक्बाल यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना म्हटले की, “नीतीमत्तेचा पाठ शिकवणारेच आज स्वतः कायद्याच्या कटघऱ्यात उभे आहेत.” त्यांनी पुढे म्हटले की, “प्रशांत किशोर यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर उघड झाला आहे. जे दुसऱ्यांना नीतीमत्तेचे धडे देतात, त्यांच्यावर अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.”
दानिश इक्बाल यांनी सांगितले की, पटण्याच्या पाटलिपुत्र पोलीस ठाण्यातील केस क्रमांक ९४/२०२० मध्ये प्रशांत किशोर यांची भूमिका “एका व्यावसायिक गुन्हेगारासारखी” दिसून येते. “‘बिहार की बात’ या मोहिमेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारे प्रशांत किशोर स्वतःच कायद्याच्या चौकटीत आहेत,” असंही त्यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले, “नीतीमत्तेचं ठेकेदारी करणे सोडून द्या. बिहारची जनता आता या नकाबधारी नेत्यांना ओळखून आहे. हे नेते नाहीत, तर राजकारणाचे चोर आहेत.”
हेही वाचा..
भारत रशियासोबत कोणत्या क्षेत्रात सहकार्य वाढवणार
संतापजनक: बंदूक काढली अन पाठलाग करत २५ कुत्र्यांना गोळ्या घातल्या!
डॉ. स्वामिनाथन यांनी अन्न उत्पादनात आत्मनिर्भर अभियानाचं केलं नेतृत्व
जस्टिस यशवंत वर्मा यांना दिलासा नाही
प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले की, “ते खऱ्या अर्थाने राजकारणाला व्यवसाय समजतात, जेथे प्रत्यक्षात राजकारणाचं उद्दिष्ट लोकसेवा असावं लागतं. बिहारच्या जनतेने अशा लोकांकडून अनेकदा फसवणूक सहन केली आहे. मात्र आजचा बिहार विकासाच्या मार्गावर आहे आणि ही जनता आता कोणतीही चूक करणार नाही. खरं तर, प्रशांत किशोर सध्या ‘बिहार बदलाव यात्रा’च्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत दौरे करत आहेत. या यात्रेदरम्यान ते भाजप आणि राजदसह अनेक राजकीय नेत्यांवर थेट आरोप करत आहेत आणि अनेक वचनं देत आहेत. ‘जन सुराज’ने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकट्याने लढण्याची आधीच घोषणा केली आहे.







