23 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेषऑपरेशन सिंदूरवर संसदेत राजनाथ सिंह काय म्हणाले ?

ऑपरेशन सिंदूरवर संसदेत राजनाथ सिंह काय म्हणाले ?

“जिन मोहि मारा, तिन मोहि मारे...”

Google News Follow

Related

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत निवेदन दिलं. भारतीय सेनेच्या अद्वितीय शौर्य आणि धैर्याचं कौतुक करत त्यांनी सांगितलं की, ६-७ मे २०२५ च्या रात्री आपल्या सैन्याने एक ऐतिहासिक मोहिम पार पाडली. राजनाथ सिंह यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अमानुषतेची परिसीमा असल्याचं म्हटलं. हल्लेखोरांनी धर्माच्या आधारावर नागरिकांची ओळख पटवून त्यांना लक्ष्य केलं.

त्यांनी माहिती दिली की, या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि निर्णायक कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली. त्यानंतर आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर घुसून त्यांचा खात्मा केला. राजनाथ सिंह म्हणाले, “सेनेने आपल्या देशातील मातांच्या आणि भगिनींच्या सिन्दूराचा बदला घेतला आहे. आता हा सिन्दूर केवळ एक प्रतीक नसून शौर्याची गाथा बनला आहे.”

हेही वाचा..

धर्मांतरविरोधी कायदा अधिक कठोर करा

‘ऑपरेशन महादेव’: पहलगाम हल्ल्याशी संबंधित ३ संशयित दहशतवादी ठार!

कर्नल सोफिया यांच्यावरील टीका प्रकरण : ‘त्या’ मंत्र्याला सुप्रीम कोर्टाने झाडले

गाझा पट्टीमधील भूकबळीबद्दल ट्रम्प यांची खंत

ऑपरेशनबाबतची माहिती देताना, त्यांनी सांगितलं, “मी अतिशय दक्षतेने हे सांगतो आहे की या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे हँडलर ठार झाले आहेत. खरे आकडे याहून अधिक असू शकतात, पण आम्ही खात्रीशीर आकडेच देतो. राजनाथ सिंह यांनी लोकसभेत पाकिस्तानच्या हल्ल्यांनंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तराविषयी सांगताना रामायणातील चौपाईचा उल्लेख केला – “जिन मोहि मारा, तिन मोहि मारे…” – याचा अर्थ, “ज्यांनी आम्हांवर हल्ला केला, त्यांनाच उत्तर दिलं.”
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आमच्या सैनिकी तळांना लक्ष्य करत हल्ला केला, मात्र भारताने प्रत्येक हल्ला निष्फळ ठरवला. त्यांनी स्पष्ट केलं की, भारताची ही कारवाई पूर्णपणे संतुलित आणि आत्मरक्षणाच्या चौकटीत होती. ७ मे ते १० मे या काळात पाकिस्तानकडून मिसाइल्स आणि लांब पल्ल्याची शस्त्रं भारतावर डागली गेली. त्यांच्या लक्ष्यांमध्ये आपल्या सैनिकी तळांचा समावेश होता, पण भारताच्या संरक्षण यंत्रणांनी आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालींनी हे सर्व हल्ले अयशस्वी ठरवले. पाकिस्तानला एकही लक्ष्य भेदता आलं नाही. शेवटी, संरक्षणमंत्री म्हणाले, “भारतीय सेनेने शत्रूचे सर्व डाव हाणून पाडले. पाकिस्तानच्या आक्रमकतेला दिलेलं उत्तर केवळ धाडसीच नव्हे तर निर्णायक देखील होतं. आपल्या जवानांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून राष्ट्राची सुरक्षा सुनिश्चित केली.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा