24 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरबिजनेसभारताचे शुल्क शून्यावर आणा आणि माफी मागा!

भारताचे शुल्क शून्यावर आणा आणि माफी मागा!

अमेरिकेचे विश्लेषक एडवर्ड प्राइस यांची ट्रम्प यांच्यावर टीका 

Google News Follow

Related

भारतावर जादा शुल्क लादल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. ज्येष्ठ अमेरिकन विश्लेषक एडवर्ड प्राइस यांनी त्यांना हे शुल्क पूर्णपणे रद्द करून माफी मागण्याची विनंती केली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, न्यू यॉर्क विद्यापीठातील प्राध्यापक प्राइस यांनी २१ व्या शतकाला आकार देण्यात भारताला “निर्णायक” खेळाडू म्हणून वर्णन केले आणि अमेरिका-भारत संबंधांना “महत्वाचे ” म्हटले.

अमेरिका चीनशी सामना करत असताना आणि रशियाशी संघर्ष करत असताना ट्रम्प यांनी शुल्क लादण्याच्या निर्णयावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. “भारतावर लादण्यात आलेल्या ५० टक्के कराची पुनर्तपासणी करून तो अधिक वाजवी किंवा शून्य टक्क्यांपर्यंत करण्यात यावा, तसेच यासंदर्भात भारताची माफी मागण्यात यावी, असे प्राइस म्हणाले.

त्यांनी अमेरिका-भारत भागीदारीचे वर्णन २१ व्या शतकातील सर्वात महत्त्वाचे संबंध म्हणून केले आणि ते चीन आणि रशियासोबतच्या घडामोडींवर परिणाम करेल असे नमूद केले. जागतिक घडामोडींमध्ये भारताची निर्णायक भूमिका आहे आणि येत्या काळात तो आणखी महत्त्वाचा खेळाडू बनणार असल्याचे प्राइस यांनी म्हटले.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आणि त्यांना “खूपच हुशार” म्हटले, कारण त्यांनी अमेरिकेला आठवण करून दिली की चीन किंवा रशियाशी पूर्ण संबंध टाळून भारताकडे पर्याय आहेत. “पंतप्रधान मोदींनी बीजिंगमध्ये अलीकडेच झालेल्या लष्करी परेडला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला, जो एक संतुलित दृष्टिकोन दर्शवतो, असे त्यांनी नमूद केले.”

“पंतप्रधान मोदी खूपच हुशार आहेत. ते अमेरिकन लोकांना आठवण करून देत आहेत, ते माझ्यासारख्या लोकांना आठवण करून देत आहेत की त्यांच्याकडे पर्याय आहेत, परंतु त्यांनी चीन आणि रशियाला पूर्णपणे स्वीकारलेले नाही आणि उदाहरणार्थ, लष्करी परेडमध्ये सहभागी होत नाहीयेत,” प्राइस म्हणाले.

हे ही वाचा : 

मध्यम अंतराचा धावपटू परवेझ खानवर डोपिंगप्रकरणी ६ वर्षांची बंदी

USOPEN 2025: जोकोविचने फ्रिट्झला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला

राजस्थानमध्ये दीड कोटींच्या नोटांनी सजले बाप्पा; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!

लखनऊमध्ये महिंद्रा थारमधून २० किलो गोमांस जप्त!

चिनी प्रभावाबाबत भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना, प्राइस यांनी यावर भर दिला की भारत एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र आहे आणि कोणत्याही बाह्य शक्तीशी कायमचा संबंध ठेवणार नाही. त्यांनी नमूद केले की रशिया सध्या चीनशी जोडलेला असला तरी, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आपले स्वातंत्र्य राखतो आणि चीनच्या प्रभाव क्षेत्रात ओढला जात नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा