22.2 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरबिजनेस‘गब्बर सिंग टॅक्स’ म्हणून हिणवणारे आता श्रेय घ्यायला आले!

‘गब्बर सिंग टॅक्स’ म्हणून हिणवणारे आता श्रेय घ्यायला आले!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Google News Follow

Related

जीएसटीमध्ये आमूलाग्र बदल केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, ज्यांनी कधी वस्तू व सेवा कराला ‘गब्बर सिंग टॅक्स’ म्हणून हिणवले होते, तेच आता सरकारच्या जीएसटी 2.0 सुधारणांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा हल्ला काँग्रेस नेत्यांनी केलेल्या त्या सूचनेनंतर झाला की सरकारने राहुल गांधींच्या प्रस्तावांनंतरच अचानक सुधारणा आणल्या, अन्यथा गेली नऊ वर्षे त्याकडे दुर्लक्ष केले होते. सीतारामन यांनी काँग्रेसवरही आरोप केला की, त्यांच्या कारकिर्दीत अत्यंत जास्त कर दर लादले गेले, ज्यामुळे व्यवसाय आणि ग्राहक दोघांनाही फटका बसला. त्याउलट, मोदी सरकारचा भर “सामान्य माणूस आणि त्याच्या अपेक्षा” यावर होता, विरोधकांच्या दबावावर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

करभार कमी करण्यासाठी जीएसटी 2.0 – पंतप्रधानांचा उद्देश

वित्तमंत्री म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधारणांवर भर दिला कारण त्यांचा उद्देश सामान्य नागरिकांचा करभार कमी करणे हा होता. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मोदींनी या सुधारणांना “१४० कोटी भारतीयांसाठीचे पाऊल” असे म्हटले होते.

हे ही वाचा:

बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकार घाबरलंय!

बंगालमधील चित्रपटगृहांना ‘द बंगाल फाइल्स’ प्रदर्शित करण्यास रोखलं जातंय!

पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा मुंबई पोलिसांना मिळाला मेसेज!

घडलंय काय?ओबीसींचं नुकसान की मराठ्यांचा फायदा?

शेतकरी आणि एमएसएमई साठी लाभदायी

जीएसटी 2.0 हा “शेतकरी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग समर्थक” असेल, असे सीतारामन यांनी सांगितले.
त्यांनी स्पष्ट केले की या सुधारणा केवळ बिहारसाठी नाहीत तर संपूर्ण देशासाठी आहेत.बिहारसारख्या उपभोगावर चालणाऱ्या राज्यांमध्ये जीएसटी दरकपातेमुळे मागणीत वाढ होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.

दरकपातीचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणार

सरकार जीएसटी दरकपातीचा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करत आहे, असे सीतारामन म्हणाल्या.
त्यांनी सांगितले की सर्व संबंधित पक्ष – राज्ये व उद्योग क्षेत्राशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
“उद्योगांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते लाभ लोकांपर्यंत पोहोचवतील,” असे त्यांनी नमूद केले.

सुधारणा – देशांतर्गत गरजांवर आधारित

जीएसटी सुधारणा गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहेत आणि त्यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आयात शुल्कांशी काहीही संबंध नाही, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. “ही वेळखाऊ प्रक्रिया आहे,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी अधोरेखित केले की सुधारणा करण्यामागे देशांतर्गत गरजा कारणीभूत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडी नाहीत.

विरोधकांना इशारा; आधी अभ्यास करा

जीएसटीवर टीका करणाऱ्या विरोधकांना उद्देशून वित्तमंत्री म्हणाल्या की “विरोधी नेत्यांनी देशाच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेबाबत बोलण्याआधी गृहपाठ करून यावा.” त्यांनी विरोधकांचा “पूर्ण अज्ञान” लोकांसमोर उघड झाल्याचे म्हटले.
तसेच भारतात जीएसटी १९६० च्या दशकात लागू होऊ शकला असता, पण राजकीय मतभेदांमुळे तो अनेक दशकं लांबला, असेही त्यांनी नमूद केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा