33 C
Mumbai
Wednesday, March 11, 2026
घरबिजनेसहोर्मुझ सामुद्रधुनीत विमा न मिळाल्याने १५० हून अधिक जहाजे अडकली

होर्मुझ सामुद्रधुनीत विमा न मिळाल्याने १५० हून अधिक जहाजे अडकली

जागतिक तेल वाहतूक आणि व्यापारावर मोठा परिणाम

Google News Follow

Related

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तीव्र संघर्षाचा परिणाम आता जागतिक समुद्री व्यापारावरही दिसू लागला आहे. इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील तणाव वाढत असताना अनेक जागतिक विमा कंपन्यांनी इराणच्या समुद्रक्षेत्रात आणि होर्मुझ सामुद्रधुनीत जाणाऱ्या जहाजांना देण्यात येणारा ‘वॉर रिस्क इन्शुरन्स’ (युद्ध धोका विमा) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या जहाजांना मोठा आर्थिक आणि सुरक्षा धोका निर्माण झाला आहे.

या निर्णयामुळे जगातील महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. सध्या किमान १५० पेक्षा जास्त तेल टँकर्स आणि मालवाहू जहाजे या परिसरात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. काही जहाजांवर हल्ले झाल्यामुळे आणि सुरक्षिततेबाबत भीती निर्माण झाल्यामुळे जहाज मालक आणि शिपिंग कंपन्या या मार्गाने जहाज पाठवण्यास टाळाटाळ करत आहेत.
हे ही वाचा:
या परिस्थितीत रशिया भारताला देणार मदतीचा हात!

बांधकाम कामगारांनी काढली विदेशी महिलेची छेड; दोघे अटकेत

आव्हाडांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा अवमान; मुंब्र्याचे नगरसेवक शानु पठाणविरुद्ध गुन्हा

इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या ध्वजावरून गायब झालेले चिन्ह पुन्हा का दिसू लागले?

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील अत्यंत महत्त्वाची ऊर्जा वाहतूक मार्गिका मानली जाते. जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) या मार्गाने विविध देशांकडे पोहोचवले जाते. त्यामुळे या मार्गातील अडथळ्याचा परिणाम थेट जागतिक ऊर्जा पुरवठा आणि तेलाच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, विमा कंपन्यांनी धोका वाढल्यामुळे जहाजांसाठी युद्धसंबंधित विमा काढून घेतल्याने शिपिंग कंपन्यांना प्रचंड अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. आधीच मध्यपूर्वेतून आशियाकडे जाणाऱ्या तेलवाहतुकीचे दर गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जर संघर्ष आणखी वाढला, तर वाहतूक खर्च, विमा प्रीमियम आणि ऊर्जा किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

या परिस्थितीचा परिणाम भारतासारख्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवरही होऊ शकतो. भारताच्या मोठ्या प्रमाणातील तेल आयातीसाठी हा समुद्री मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गातील अस्थिरता वाढल्यास भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेवर आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अमेरिके-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराणकडून प्रतिहल्ले झाल्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी, ऊर्जा बाजार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. जर तणाव कमी झाला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही याचे दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा