28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरअर्थजगतटोल वसूली झाली ‘फास्ट’

टोल वसूली झाली ‘फास्ट’

Google News Follow

Related

देशभरात फास्टॅग सक्तीचे झाल्यानंतर देशभरातून या द्वारे होणारी टोल वसूली वाढली असल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया- एनएचएआय) सांगितले आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ पासून देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग सक्तीचे केल्यानंतर या मार्गांनी होणारी टोल वसूली ₹१०४ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

हे ही वाचा:

गब्रूंना पाठीशी घालणारे पुरोगामी, विचारी

या आठवड्यात फास्टॅगच्या माध्यमातून होणारी वसूली सातत्याने ₹१०० कोटींच्या वर राहिली आहे आणि २५ फेब्रुवारी रोजी ती सर्वोच्च ₹१०३.९४ कोटी पर्यंत पोहोचली होती. सुमारे ६४.५ लाख देवाणघेवाणींतून इतकी रक्कम गोळा झाली आहे.

एनएचएआयने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार फास्टॅमुळे इलेक्ट्रॉनिक टोल वसूलीमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे, तर फास्टॅगमुळे गोळा होणाऱ्या फीच्या रुपाने देखील २७ टक्के वाढ झाली आहे.

गेल्या दोन आठवड्यात सुमारे २० लाख लोकांनी फास्टॅगचा वापर करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे फास्टॅग वापरकर्त्यांची संख्या आता सुमारे २.८ कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे.

एनएचएआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार टोल वसुली सुलभ झाली आहे. फास्टॅगचा वापर भविष्यात रस्त्यांवरून मिळणाऱ्या परताव्याचे अचूक गणित करण्यास उपयोगी ठरू शकेल. त्यामुळे भविष्यातील महामार्ग बांधणीच्या प्रकल्पांना चालना मिळेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा