दिल्ली बॉम्बस्फोटांच्या चौकशीनंतर आता महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्थेभोवती केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा फास विणला जात आहे. फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाप्रमाणेच जामिया इस्लामिया संस्थेच्या कारवायांची चौकशी करण्याची मागणी तीव्र झाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेत्यांनी आरोपांची एक लांबलचक यादी समोर आणली आहे, ज्यात बेकायदेशीररित्या परकीय निधी गोळा करण्यापासून ते धर्मांतरण, जमीनी कब्ज़ा करणे आणि परदेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे आश्रय देण्याचे आरोप लावण्यात आले आहेत.
मुंबईतील पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की जामिया इस्लामिया संस्था शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली देशविरोधी कारवाया करत आहे. त्यांनी आरोप केला की संस्थेला बेकायदेशीररित्या परकीय निधी मिळत आहे, हा निधी धर्मांतर आणि देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो आहे. संस्थेने आदिवासी समुदायांच्या जमिनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्या आहेत आणि तेथे शिकणारे ९०% पेक्षा जास्त विद्यार्थी कथितरित्या बांगलादेशी नागरिक आहेत. सोमय्या म्हणाले की ही बाब सुरक्षेसाठी चिंताजनक आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारने यात त्वरित हस्तक्षेप करावा.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनीही संस्थेविरुद्ध गंभीर आरोप पुन्हा केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या तक्रारीनंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की ही संस्था बंदी घातलेल्या इस्लामिक संघटनांना निधी देत होती, मोठ्या प्रमाणात धर्मांतराच्या कामांमध्ये सहभागी होती आणि कॅम्पसमध्ये १०,००० हून अधिक विद्यार्थी राहतात, त्यापैकी मोठ्या संख्येने बांगलादेशी आणि येमेनी नागरिक आहेत, जे की वैध कागदपत्रांशिवाय राहत आहेत. चौधरी म्हणाले की तपास जसजसा पुढे जाईल तसतसे अधिक धक्कादायक खुलासे होऊ शकतात.
या आरोपांनंतर, केंद्र आणि राज्य सरकारने संस्थेच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप केला आहे आणि प्रशासक म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. भाजप नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही आणि संस्थेकडूनही औपचारिक प्रतिसाद मिळालेला नाही.
हेही वाचा..
आरएसएस कार्यकर्ता नवीनच्या हत्येचा मुख्य आरोपी बादल चकमकीत ठार
इंटरनॅशनल आयडीईएचे नेतृत्व करतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
पंतप्रधान उद्या उडुपीचा दौरा करणार
द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी परभवानंतर गौतम गंभीरबद्दल बीसीसीआयने काय म्हटले?
१९७९ मध्ये स्थापन झालेली जामिया इस्लामिया इशातुल उलूम ही अकलकुवा (नंदुरबार) येथील एक मोठी शैक्षणिक आणि कल्याणकारी संस्था म्हणून ओळखली जाते. १५,००० हून अधिक विद्यार्थी असल्याचा दावा करणारी ही संस्था अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, कायदा आणि बी.एड. महाविद्यालये चालवते. या कॅम्पसमध्ये ३०० खाटांचे नूर हॉस्पिटल देखील चालवले जाते, जिथे गरीब रुग्णांना जवळजवळ मोफत उपचार मिळतात.
आदिवासी बहुल भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करत असल्याचा दावा ही संस्था करते परंतु आता, गंभीर आरोप आणि सरकारी चौकशीमुळे ही संस्था निरळ्याच कारणाने प्रकाशझोतात आली आहे.







