28 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरक्राईमनामामुंबईच्या समुद्रात बोड बुडाली, दोनजण बेपत्ता

मुंबईच्या समुद्रात बोड बुडाली, दोनजण बेपत्ता

Google News Follow

Related

मुंबईच्या समुद्रात अजूनही पावसामुळे बोटी पाण्यात उतरविण्यास मनाई आहे. मुंबईच्या समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असून तिथे जाणे धोक्याचे आहे, असे सांगण्यात आले आहे. तरीही काही जण या नियमांचा भंग करून समुद्रात उतरतात. अशीच एक बोट वर्सोव्याच्या समुद्रात उतरविण्यात आली. त्यातील दोन जण बुडून मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले आहे.  

पोलिस प्रशासनाने यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र या आवाहनाची दखल काही लोक घेत नाहीत. या बोटीत तीन जण प्रवास करत होते. त्यातील एकाने बोट बुडाल्यावर किनारा गाठला पण दोन जण बुडून मृत्युमुखी पडले. किनाऱ्यावर पोहोचलेल्या मच्छिमाराचे नाव विजय बामनिया (३५) असल्याचे कळते.

हे ही वाचा:

नूंह हिंसाचार प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा ‘आप’ नेत्यावर आरोप

लोकलमध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा फेक कॉल

‘अमृत भारत स्टेशन योजनेतून’ नवा अध्याय !

शह आणि मात की शह आणि माफ?  

रात्रीचे साडेनऊ वाजलेले असताना ही घटना घडली. त्यावेळी हे तिघेजण बोट घेऊन वर्सोव्याच्या समुद्रात उतरले होते. त्यावेळी ही बोट बुड़ाली. या घटनेत जे दोघे बुडाले त्यांचा शोध घेण्य़ासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. मात्र रात्रीच्या अंधारात हे शोधकार्य यशस्वीपणे राबवता आले नाही. बुडालेल्या दोघांची नावे उस्मानी भंडारी आणि विनोद गोयल अशी होती. यासंदर्भात लाइफ गार्ड, मुंबई महानगरपालिका आणि तटरक्षक दलाकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा