25 C
Mumbai
Tuesday, December 30, 2025
घरक्राईमनामाबिहार : अंधश्रद्धेतून झाली कुटुंबाची हत्या

बिहार : अंधश्रद्धेतून झाली कुटुंबाची हत्या

जादू-टोण्याच्या संशयातून 5 जणांना जाळले

Google News Follow

Related

बिहारच्या पूर्णिया येथे रविवारी (6 जुलै) एकाच कुटुंबातील 5 जणांची जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. अंधश्रद्धेतून स्थानिक रानीपतारा तेटगामा गावात हे हत्याकांड घडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे मारेकऱ्यांनी हत्येनंतर पाचही मृतदेह गायब केले होते.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूर्णियाच्या रानीपतारा तेटगामा गावात काही महिन्यांपूर्वी 4 ते 5 बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गावातील सीतादेवी या महिलेवर जादू-टोण्याचा संशय होता. त्यामुळे हल्लेखोरांना रविवारी मध्यरात्रीनंतर 3 वाजता सदर महिलेच्या कुटुंबावर हल्ला चढवला. सीतादेवीसह कुटुंबातील 5 जणांना घरातून ओढत एका तलावाजवळ आणले. त्यांना अमानुषरित्या मारहाण करत अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले. या दुर्दैवी घटनेतून कुटुंबातील 16 वर्षाचा सोनू कुमार हा मुलगा सुदैवाने वाचला. त्याने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मुलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी 4 आरोपींची नावे उघड झाली असून त्यापैकी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत गावातील अनेक लोकांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा