25 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरक्राईमनामासुरक्षा दलाने १२ तासात ५ दहशतवादी मारले

सुरक्षा दलाने १२ तासात ५ दहशतवादी मारले

Google News Follow

Related

भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. गेल्या १२ तासांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन वेगवेगळ्या चकमकीत या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. काश्मीरच्या आयजीपी यांनी हे सुरक्षा दलाचे मोठे यश असल्याचे म्हटले आहे.

शनिवारी २९ जानेवारी रोजी रात्री बडगाम जिल्ह्यातील चरार ए शरीफ आणि पुलवामा जिल्ह्यात नायरा इथे सुरक्षा दलाने शोधमोहिम राबवली होती. यावेळी बडगाममध्ये एक आणि पुलवामात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैशचा कमांडर जाहीद वाणी याच्यासह एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.

हे ही वाचा:

मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाने गमावला पाय

सामूहिक बलात्काराने पेण हादरले; सात जणांना घेतले ताब्यात

नथुरामवरील चित्रपटाचे भवितव्य

कोर्ट ‘मविआ’ला दिलासा का देत नाही?

जाहीद वाणी हा जम्मू काश्मीरमध्ये जैशच्या टॉप कॅडरपैकी एक होता. तो पुलवामा हल्ल्यात सहभागी होता. २०१९ मध्ये झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून कारवाया करण्याचा प्रयत्न केला गेला. कुलगाम जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येनंतर पुलावामातील नायरा भागात सुरक्षादलांनी गोळीबार केला. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर फौजफाटाही तैनात करण्यात आला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा