25 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरक्राईमनामामामाच्या मुलाशी हट्टाने लग्न केले...मुलाने बेंगळुरूत त्याच बायकोला संपवले आणि बॅगेत कोंबले

मामाच्या मुलाशी हट्टाने लग्न केले…मुलाने बेंगळुरूत त्याच बायकोला संपवले आणि बॅगेत कोंबले

राकेशने स्वतः गौरीच्या पालकांना फोन करून हत्येची कबुली दिली

Google News Follow

Related

राकेश खेडेकर नावाच्या इसमाने आपली पत्नी गौरीचा खून करून तिचा मृतदेह बेंगळुरूत सूटकेसमध्ये भरून ठेवला आणि नंतर तो मुंबईत परतला. मात्र पोलिसांनी त्याला आता अटक केली आहे. या घटनेतील क्रौर्यामागे कोणता इतिहास दडला आहे हे राकेश खेडेकरच्या वडिलांनी सांगितले.

बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये लपवणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी “इंडिया टुडे” ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या मुलाने त्यांना काय सांगितले हे उघड केले आहे. राजेंद्र यांच्या मते, राकेशने त्यांना फोन करून सांगितले की, त्याने गौरीचा खून केला आहे. त्याचप्रमाणे, काही दिवस आधीच राकेशने आपली सासू (गौरीची आई) ला फोन करून सांगितले होते की गौरी त्याला त्रास देत आहे.

राजेंद्र यांनी सांगितले, “माझ्या मुलाने मला फोन करून सांगितले की मी हे केले आहे कारण ती नेहमीच त्याच्याशी भांडत होती. गौरी ही त्यांची भाची होती, कारण तिची आई ही राजेंद्र खेडेकर यांची बहीण आहे. ते पुढे म्हणाले, “ती नेहमी वाद घालत असे. तिने माझ्या ८६ वर्षांच्या आईलाही त्रास दिला. ती राकेशला पूर्वीही मारहाण करत असे. तिने त्याच्या भावालाही एकदा मारले होते.

हत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न

राजेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, राकेशने रात्री १२ वाजता बंगळुरू सोडले आणि दुपारी त्यांना फोन केला. ते म्हणाले, “तो म्हणाला, मी हे कृत्य केले आहे. आता मी आत्महत्या करणार आहे. मीही जगणार नाही. राजेंद्र यांनी त्याला घाईने काहीही करू नका असे सांगितले आणि “घरी ये, आपण एकत्र पोलिस ठाण्यात जाऊ, असे सांगितले. राकेशने त्यांना हेदेखील सांगितले की, “गौरीच्या आईला सांगा की मी हे केले आहे.

हे ही वाचा:

न्यायव्यवस्थेचे ब्रीद बदलल्याचा खोटा प्रचार करणाऱ्या निरंजन टकलेवर गुन्हा दाखल!

छत्तीसगड : नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात एक जवान जखमी!

ग्रेटर नोएडात मुलींच्या वसतिगृहाला आग, विद्यार्थिनींनी मारल्या इमारतीवरून उड्या

चेंडू सीमापार करण्याचा कसून सराव : आशुतोष शर्मा

घटनेचा तपशील आणि पोलिसांची कारवाई

पोलिसांच्या मते, राकेश आणि गौरी यांच्यात तिच्या बेरोजगारीवरून सतत वाद होत असत. २६ मार्च रोजी झालेल्या भांडणात राकेशने गौरीला थप्पड मारली. त्यावर संतप्त झालेल्या गौरीने सुरीने त्याला जखमी केले. रागाच्या भरात राकेशने तीच सुरी वापरून तिला अनेक वेळा भोसकले, नंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून बाथरूममध्ये लपवला. यानंतर त्याने एका शेजाऱ्याला घटनेची माहिती दिली. ज्याने घरमालकाला कळवले आणि मग पोलिसांना बोलावण्यात आले.

राकेशने स्वतः गौरीच्या पालकांना फोन करून हत्येची कबुली दिली. त्यानंतर त्याने विष प्राशन केले आणि पुण्यातील शिरवळ पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. प्राथमिक उपचारांसाठी त्याला सातारा रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर पुण्यातील ससून रुग्णालयात हलवले.

कुटुंबाच्या विरोधानंतरही त्यांनी लग्न केले

राजेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, राकेश आणि गौरी हे भाऊ-बहीण आहेत. त्यामुळे कुटुंबाने त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. ते म्हणाले, “तरीही दोघेही हट्टी होते. त्यांनी चार वर्षे वाट पाहिली, पण शेवटी आम्ही त्यांच्या आग्रहासमोर झुकलो. आता आम्ही काय करू शकतो? त्यांना रोखता येणार नव्हते. म्हणून आम्ही त्यांचे लग्न लावले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा