27 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरक्राईमनामासलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन

सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन

कुपवाडा, पूंछमधील नियंत्रण रेषेवर आलेल्या चौक्या लक्ष्य

Google News Follow

Related

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये जबरदस्त तणाव असतानाही पाकिस्तानकडून सीमा रेषेवर नापाक कारवाया केल्या जात आहेत. पाकिस्तानकडून सलग चौथ्या दिवशीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या या कुरघोड्यांना भारतीय सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तान दररोज रात्री हलक्या शस्त्रांनी गोळीबार करत आहे.

भारतीय लष्कराने म्हटले आहे की, “२७-२८ एप्रिल २०२५ च्या रात्री, कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी कोणत्याही चिथावणीशिवाय लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराच्या जवानांनीही या हल्ल्याला जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.” नियंत्रण रेषेवर (एलओसी) तणाव असतानाही पाकिस्तानने सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच ठेवले. यापूर्वी २६- २७ एप्रिल २०२५ च्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी तुतमारी गली आणि रामपूर सेक्टरच्या समोरील भागात नियंत्रण रेषेवर विनाकारण लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केला. यावर भारतीय सैन्याने योग्य लहान शस्त्रांनी गोळीबार करून प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, कुलगाम पोलिसांनी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. कायमोहमधील मतलहामा चौक ठोकेरपोरा येथे स्थापन केलेल्या नियमित चौकीदरम्यान, दोन व्यक्तींना अडवण्यात आले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांची ओळख अब्दुल सलाम भटचा मुलगा बिलाल अहमद भट आणि गुलाम मोहम्मद भटचा मुलगा मोहम्मद इस्माईल भट अशी झाली आहे. दोघेही ठोकेरपोरा, कायमोह येथील रहिवासी आहेत. कारवाई दरम्यान, सुरक्षा दलांनी त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल, दोन पिस्तूल मॅगझिन आणि २५ राउंड पिस्तूल दारूगोळा जप्त केला. कायमोह पोलिस स्टेशनमध्ये कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

“इच्छा तिथे मार्ग”, मुख्यमंत्र्यांनी ‘मन कि बात’चा भाग गाडीतच पाहिला!

घाटकोपर: सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुस्लीम जमात गौसिया मशिदीचे भोंगे उतरवले!

विक्रोळीत १३ बांग्लादेशी फेरीवाले ताब्यात!

भारतात ६२५ विमान मार्ग सुरू, १.४९ कोटी प्रवाशांना याचा फायदा

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा यंत्रणांनी या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांचा शोध तीव्र केला आहे. तर, नवी दिल्लीने व्हिसा रद्द करणे आणि १९६० च्या सिंधू पाणी कराराचे निलंबन यासह अनेक कठोर पावले उचलण्याची घोषणा केली आहे. पाकिस्ताननेही १९७२ चा शिमला करार स्थगित करून आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करून प्रत्युत्तर दिले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा