26 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरधर्म संस्कृतीकाशी तमिळ संगमम ४.० : तमिळनाडूहून वाराणसीला पोहोचणे सुलभ

काशी तमिळ संगमम ४.० : तमिळनाडूहून वाराणसीला पोहोचणे सुलभ

रेल्वे चालवत आहे सात विशेष गाड्या

Google News Follow

Related

भारतीय रेल्वे कन्याकुमारी, चेन्नई, कोयंबतूर आणि वाराणसी यांच्यामधील सात विशेष गाड्यांचे संचालन करत आहे. त्यामुळे चौथ्या काशी तमिळ संगमममध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग सुनिश्चित करता येणार आहे तसेच तमिळ भाषिक क्षेत्र आणि काशी या प्राचीन आध्यात्मिक केंद्रामधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होणार आहेत.

या विशेष गाड्या बहुदिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रवाशांना अखंडीत प्रवास, आरामदायी लांब पल्ल्याची जोडणी आणि वेळेवर पोहोच सुनिश्चित करण्यासाठी चालविण्यात येत आहेत. २९ नोव्हेंबर रोजी कन्याकुमारीहून पहिली गाडी रवाना झाली. त्यानंतर मंगळवारी चेन्नईहून एक अतिरिक्त विशेष गाडी सोडण्यात आली. पुढील प्रस्थान ३ डिसेंबरला कोयंबटूरहून, ६ डिसेंबरला चेन्नईहून, ७ डिसेंबरला कन्याकुमारीहून, ९ डिसेंबरला कोयंबतूरहून आणि १२ डिसेंबरला चेन्नईहून आहे.

हेही वाचा..

‘धर्मांतरणानंतर अनुसूचित जातीचा लाभ मिळतोच कसा?’

एअर इंडियाच्या एअरबसचे महिनाभर सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय उड्डाण

पाकिस्तानने श्रीलंकेला पाठवली मुदत संपलेली पाकिटे

राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) गुंतवणूकदार खात्यांची संख्या २४ कोटी पार

या नियोजित प्रस्थानांसह, तमिळनाडूतील प्रमुख शहरांमधून वाराणसीसाठी एकूण सात विशेष गाड्या सुव्यवस्थित आणि टप्प्या-टप्प्याने चालविण्यात येतील. परतीचा प्रवास वेळेवर आणि सोयीस्कर होण्यासाठी, भारतीय रेल्वेने वाराणसीहून अनेक विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. यामध्ये ५ डिसेंबरला कन्याकुमारीसाठी, ७ डिसेंबरला चेन्नईसाठी आणि ९ डिसेंबरला कोयंबटूरसाठी गाडीचा समावेश आहे. याशिवाय ११ डिसेंबरला चेन्नई, १३ डिसेंबरला कन्याकुमारी, १५ डिसेंबरला कोयंबटूर आणि १७ डिसेंबरला चेन्नईसाठीही अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवल्या जातील.

मंगळवारपासून सुरू होत असलेले काशी तमिळ संगममचे चौथे संस्करण, तमिळनाडू आणि काशी यांच्यातील दीर्घकालीन सांस्कृतिक नातेसंबंधांना सातत्य देते. यावेळी ‘आइए तमिळ सीखें – तमिळ कर्कलम’ या विषयावर विशेष भर दिला आहे. वाराणसीतील शाळांमध्ये तमिळ भाषा शिकविण्याची योजना, काशी परिसरातील विद्यार्थ्यांना तमिळनाडूतील अभ्यासदौरे आणि तेनकाशी ते काशी असा प्रतीकात्मक ऋषी अगस्त्य वाहन अभियान याद्वारे भाषिक व सांस्कृतिक आदानप्रदानास चालना दिली जाणार आहे.

काशी तमिळ संगमम ४.० हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे प्रतिबिंब आहे, जे लोकांना स्वतःच्या संस्कृतीसोबत इतर समृद्ध संस्कृतींचेही आकलन आणि कौतुक करण्यास प्रोत्साहित करते. या उपक्रमाचे नेतृत्व शिक्षण मंत्रालय करत असून आयआयटी मद्रास आणि बनारस हिंदू विद्यापीठ हे प्रमुख ज्ञानभागीदार आहेत. रेल्वेसह १० मंत्रालयांच्या सहभागामुळे या कार्यक्रमात दोन्ही प्रदेशातील विद्यार्थी, कारागीर, विद्वान, आध्यात्मिक गुरु, शिक्षक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते एकत्र जोडले जातात. यातून त्यांच्यातील विचार, सांस्कृतिक परंपरा आणि पारंपरिक ज्ञानाचा आदानप्रदान अधिक सुलभ होतो. सात विशेष रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा या प्रवासाचे समन्वयन करून, भारतीय रेल्वे देशातील विविध भागांना जोडण्यात आणि तमिळनाडू व काशी यांच्यातील सामायिक वारसा अधिक बळकट करण्यात केंद्रबिंदूची भूमिका निभावत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा