23.2 C
Mumbai
Tuesday, January 20, 2026
घरदेश दुनियाइराणमधून ३०० भारतीयांसह विमान दिल्लीत पोहचणार

इराणमधून ३०० भारतीयांसह विमान दिल्लीत पोहचणार

इराणमधील परिस्थिती चिंताजनक

Google News Follow

Related

इराणमध्ये जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला असून जागोजागी आंदोलन सुरू आहे. इराणमधील परिस्थिती चिंताजनक असून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील देश सतर्क झाले असून भारतानेही नागरिकांना इराण सोडण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, इराणमधून भारतीयांना घेऊन येणारे पहिले विमान दिल्लीत येणार आहे. हे विमान शुक्रवारी दिल्लीत पोहोचेल, ज्यामध्ये ३०० लोक असतील. अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ल्याचा धोका आहे आणि त्यामुळे भारतीय दूतावासाने लोकांना येथून निघून जाण्याचे आवाहन केले आहे. तेहरानने व्यावसायिक उड्डाणांसाठी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले होते.

इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्रालय त्यांना बाहेर काढण्यासाठी आधीच तयारी करत आहे. या अंतर्गत, पहिले विमान आज ३०० भारतीयांसह दिल्लीत पोहोचेल. यासाठी, भारत सरकार अनेक विमान कंपन्यांशी संपर्क साधत आहे आणि इराणमधून लोकांना आणण्यासाठी चार्टर विमानांची व्यवस्था देखील केली जात आहे. ‘हिंदुस्तान समाचार’ने याविषयी वृत्त दिले आहे. विरोधी पक्षनेते असदुद्दीन ओवैसी यांनीही सरकारला अनेक वेळा आवाहन केले आहे की इराणमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. इराणमध्ये सुमारे ५००० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण १०,००० भारतीय इराणमध्ये आहेत. सरकार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे आणि त्यांना बाहेर काढण्याची तयारी करत आहे.

हे ही वाचा:

रोख रकमेप्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची चौकशी होणार

मेहुल चोक्सीचा मुलगा मनी लाँड्रिंगमध्ये सक्रिय!

अखेर ट्रम्प यांना मिळाला नोबेल पुरस्कार! प्रकरण काय?

नामदेव ढसाळ यांच्या पत्नीची काळजी घेतंय फडणवीस सरकार

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, इराणमध्ये शिकणाऱ्या ७० ते ८० मुलांच्या कुटुंबांनी त्यांच्याकडे आवाहन केले आहे आणि त्यांना परत आणण्यासाठी मदत मागितली आहे. हे विद्यार्थी इराणमधील शाहिद बेहेश्ती विद्यापीठात शिकत आहेत. ते म्हणाले की, इराणमध्ये आमचे शेकडो विद्यार्थी सध्या अडकले आहेत. ते म्हणाले की, आणखी एक समस्या अशी आहे की काही मुले गरीब कुटुंबातील आहेत आणि त्यांच्याकडे तिकिटे खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. अशा परिस्थितीत, सरकारकडून या लोकांना परत आणण्याची एकमेव आशा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा