29 C
Mumbai
Wednesday, March 11, 2026
घरदेश दुनिया'इराणी जहाजाला भारतीय बंदरात थांबण्याची परवानगी का दिली?'

‘इराणी जहाजाला भारतीय बंदरात थांबण्याची परवानगी का दिली?’

जयशंकर यांनी सांगितली भूमिका

Google News Follow

Related

अमेरिकेच्या पाणबुडीने श्रीलंकेजवळ हिंद महासागरात एका इराणी युद्धनौकेला बुडवल्यानंतर काही दिवसांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताने दुसऱ्या इराणी नौकेला बंदरात थांबण्याची परवानगी का दिली याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की हिंद महासागरात परकीय लष्करी उपस्थिती ही “वास्तविकता” आहे.

नवी दिल्लीतील रायसिना डायलॉग २०२६ मध्ये बोलताना जयशंकर यांनी इराणी जहाजांशी संबंधित घटनाक्रम स्पष्ट केला.

ते म्हणाले, “इराणकडून आम्हाला संदेश आला की त्यांच्या एका जहाजाला अडचणी येत आहेत आणि ते आमच्या बंदरात येऊ इच्छित आहे. १ मार्च रोजी आम्ही त्यांना परवानगी दिली. काही दिवसांनी ते जहाज कोची येथे येऊन लागले. जहाजावर अनेक तरुण कॅडेट होते. जहाज निघाले तेव्हा परिस्थिती वेगळी होती, पण येथे पोहोचेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदलली होती.”

त्यांनी सांगितले की ही जहाजे मूळतः एका नौदल समारंभासाठी आली होती, परंतु नंतर अचानक वाढलेल्या संघर्षामुळे ती परिस्थितीत अडकली.

हे ही वाचा:

मोदींचा पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’: शाहपूर कंडी धरण प्रकल्प

धर्माचार्य ब्रह्मचारी श्री विश्वनाथजी महाराज यांचा जन्मशताब्दी वर्ष महोत्सव

होर्मुझ सामुद्रधुनी: जगाच्या ऊर्जा पुरवठ्याची जीवनरेखा

भारतात पेट्रोल-डिझेल दर वाढणार नाहीत; ऊर्जा साठा मजबूत

तीन इराणी जहाजे केंद्रस्थानी

मार्चच्या पहिल्या आठवड्यात इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तीन इराणी नौदल जहाजे चर्चेत आली: IRIS Dena, IRIS Lavan, IRIS Bushehr ही जहाजे यापूर्वी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू आणि मिलान २०२६ सरावात सहभागी झाली होती.

मानवीय दृष्टिकोनातून निर्णय

जयशंकर यांनी स्पष्ट केले की भारताचा निर्णय मुख्यतः मानवीय दृष्टिकोनातून घेतला गेला. “श्रीलंकेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यांनी आपला निर्णय घेतला. दुर्दैवाने एका जहाजाला वाचवता आले नाही. आम्ही मानवतेच्या दृष्टीने परिस्थितीकडे पाहिले आणि योग्य निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.

इराणी युद्धनौका बुडाली

४ मार्च रोजी आयआरआयएस देना या इराणी युद्धनौकेवर अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडो हल्ला केला. हा हल्ला गॉलजवळील आंतरराष्ट्रीय पाण्यात, श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापासून सुमारे ४० नॉटिकल मैलांवर झाला. या हल्ल्यात जहाज बुडाले. श्रीलंकन अधिकाऱ्यांनी ८७ मृतदेह बाहेर काढले, तर ३२ नौसैनिकांना जिवंत वाचवून गॉल येथे उपचारासाठी नेण्यात आले. काही नौसैनिक अद्याप बेपत्ता असल्याचेही सांगितले जाते.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री  पीट हेगसेट यांनी या हल्ल्याची पुष्टी करत सांगितले की दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकेने टॉरपीडोने शत्रूची युद्धनौका बुडवली.

कोचीमध्ये इराणी जहाज

दरम्यान, आयआरआयएस लवण या जहाजाने तांत्रिक बिघाडाची माहिती देत भारताकडे आपत्कालीन थांब्याची विनंती केली होती. ही विनंती २८ फेब्रुवारीला आली आणि भारताने १ मार्चला परवानगी दिली. ४ मार्च रोजी ते जहाज कोची बंदरात लागले आणि तांत्रिक तपासणी सुरू आहे.

तिसरे जहाज आयआरआयएस बुशेर श्रीलंकेजवळ इंजिन बिघाडामुळे थांबले होते. श्रीलंकेने त्याला बंदरात येण्याची परवानगी देऊन जहाज ताब्यात घेतले.

हिंद महासागराची “वास्तविकता”

जयशंकर यांनी सांगितले की हिंद महासागरात परकीय लष्करी तळांची उपस्थिती नवीन नाही. उदाहरण म्हणून त्यांनी दिएगो गार्शिया या बेटाचा उल्लेख केला, जिथे १९७० च्या दशकापासून अमेरिका-ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ आहे.

तसेच जिबोती मध्ये विविध देशांचे लष्करी तळ आणि हंबनटोटा बंदराचा विकास यांसारख्या घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की हिंद महासागरात विविध देशांची उपस्थिती ही वास्तव आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भारताला संतुलित धोरण ठेवावे लागते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा