28 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरदेश दुनिया'महात्मा गांधींच्या सूचनेवरून सावरकरांनी केली होती दयायाचिका'

‘महात्मा गांधींच्या सूचनेवरून सावरकरांनी केली होती दयायाचिका’

Google News Follow

Related

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

अंदमानच्या तुरुंगात असताना महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार वीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या वीर सावरकर ‘हू कुड हॅव प्रिव्हेन्टेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतदेखील उपस्थित होते.

राजनाथ म्हणाले की, सावरकर हे महान स्वातंत्र्यसैनिक होते आणि महानायक होते. काहीजण त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करतात पण विशिष्टविचारधारेने प्रभावित झालेल्या गटाला सावरकरांचे कार्य माहीत नाही किंवा ते त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यांना सावरकरांची योग्य समजही नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्याची इच्छाशक्ती प्रबळ होती. त्यामुळेच ब्रिटिशांनी त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण काही लोक त्यांच्यासारख्या राष्ट्रवादी विचारांवर आक्षेप घेतात व प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

राजनाथ यांनी सांगितले की, काही लोक सावरकरांवर नाझी, फॅसिस्ट असल्याचा आरोप करतात पण जे असे आरोप करतात ते स्वतः लेनिनवादी, मार्क्सवादी विचारसरणीने प्रभावित झालेले आहेत. सावरकर हे वास्तववादी आणि राष्ट्रवादी होते. ते निरोगी लोकशाहीची चर्चा करत असत.

 

हे ही वाचा:

पालिकेत मराठी अधिकाऱ्याला डावलून अमराठी अधिकाऱ्याला नियुक्ती?

मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते…

पुणे हादरले! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या

‘मलबार’ का वाढवतोय चीनची चिंता?

 

राजनाथ म्हणाले की, सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, कार्याबद्दल मतभेद असतील, पण त्यांचे देशासाठीचे योगदान नाकारता येणार नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा