27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरदेश दुनियापंतप्रधान मोदींनी बांगलादेशला लिहिले पत्र; १९७१ च्या मुक्ती युद्धाची करून दिली आठवण

पंतप्रधान मोदींनी बांगलादेशला लिहिले पत्र; १९७१ च्या मुक्ती युद्धाची करून दिली आठवण

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी लिहिले पत्र

Google News Follow

Related

भारताचा शेजारी देश असलेला बांगलादेश २६ मार्च रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. पाकिस्तानच्या पराभवानंतर १९७१ मध्ये याच दिवशी बांगलादेशची स्थापना झाली होती. बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात शेख मुजीबुरहमान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, बांगलादेशमध्ये सत्तापालटानंतर शेख मुजीबुरहमान यांचा विसर पडताना दिसत आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना पत्र लिहित त्यांच्या देशाच्या मुक्ती युद्धाची आठवण करून दिली आहे. पत्रात, पंतप्रधान मोदींनी मुक्ती युद्धाला भारत आणि बांगलादेशमधील संबंधांचा मार्गदर्शक म्हणून वर्णन केले आहे.

दिल्ली आणि ढाका यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र लिहिले. दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी वाढवण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान मोदींनी लिहिले की, “महामहिम, मी तुम्हाला आणि बांगलादेशच्या जनतेला बांगलादेशच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा देतो. हा दिवस आपल्या सामायिक इतिहासाची आणि आपल्या द्विपक्षीय भागीदारीचा पाया रचलेल्या बलिदानांची साक्ष देतो. बांगलादेशच्या मुक्ती युद्धाची भावना आपल्या संबंधांना मार्गदर्शन करत आहे, जे अनेक क्षेत्रांमध्ये बहरले आहेत आणि आपल्या लोकांना प्रत्यक्ष फायदे देत आहेत. शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठीच्या आपल्या समान आकांक्षांनी प्रेरित होऊन आणि एकमेकांच्या हितसंबंधांबद्दल आणि चिंतांबद्दल परस्पर संवेदनशीलतेवर आधारित, ही भागीदारी आणखी विकसित करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. माझ्या सर्वोच्च विचाराचे आश्वासन स्वीकारा.”

हे ही वाचा:

वाल्मिक ‘आका’चा पाय खोलात; तीन आरोपींनी दिली हत्येची कबुली

दिशा सालीयनच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाच्या गोष्टी आल्या समोर

कोरटकर सापडला बातमी मात्र फरार !

उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ???

भारताच्या दीर्घकालीन मित्र शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार देशव्यापी आंदोलनानंतर पाडण्यात आल्यानंतर आणि माजी पंतप्रधानांना भारतात आश्रय घेण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. यानंतर स्थापन झालेल्या अंतरिम सरकारचे नेतृत्व नोबेल पारितोषिक विजेते आणि अर्थशास्त्रज्ञ मुहम्मद युनूस करत आहेत. दरम्यान, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर विशेषतः हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशकडे आपल्या चिंता व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, ढाका म्हणाले आहे की हे हल्ले जातीय नसून राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर अंतरिम सरकारशी संपर्कात आहे आणि असे मुद्दे उपस्थित करत राहील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा