31 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरदेश दुनियाभारत सरकारवर टीका करत शाहिद आफ्रिदी राहुल गांधींवर उधळतोय स्तुतिसुमने

भारत सरकारवर टीका करत शाहिद आफ्रिदी राहुल गांधींवर उधळतोय स्तुतिसुमने

भाजपाने आफ्रिदीसह कॉंग्रेसवर डागले टीकास्त्र

Google News Follow

Related

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा पराभव केला. शिवाय खेळ संपल्यानंतर खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. यामुळे पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. यावरून भारतीय खेळाडूंवर टीका केली जात असून आता यात राजकारणाला मध्ये आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, यासोबतच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मात्र स्तुतिसुमने उधळली जात आहेत. यामुळे भाजपाकडून प्रतिक्रिया येत आहेत.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने एका टीव्ही कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे, तर दुसरीकडे भारताच्या भाजपा नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे आणि यामुळे सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया उमटली आहे. शाहिद आफ्रिदी म्हणत आहे की, “हे सरकार (भारतात) सत्तेत राहण्यासाठी नेहमीच धर्म आणि मुस्लिम-हिंदू कार्ड खेळते. ही खूप वाईट मानसिकता आहे. आणि हे राज्यकर्ते असेपर्यंत होत राहील. त्यांच्याकडे काही चांगलेही लोक आहेत. उदाहरणार्थ, राहुल गांधींची मानसिकता खूप सकारात्मक आहे. ते संवादावर विश्वास ठेवतात, लोकांना सोबत घेऊन जातात,” असे आफ्रिदी बोलत आहे.

हे ही वाचा : 

पाकला पराभव झेपेना; टीव्हीवर सूर्यकुमार यादवबद्दल अश्लील भाषेत टीका

भारतीय क्रिकेट संघासाठी अपोलो टायर्स नवा प्रायोजक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपातर्फे ‘सेवा पंधरवडा’

भारत ड्रग्ज तस्करीत सहभागी १६,००० परदेशी नागरिकांना हद्दपार करणार!

यावरून सोशल मीडियावर आफ्रिदी आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारताचा द्वेष करणाऱ्या प्रत्येकाला राहुल गांधी आणि काँग्रेसमध्ये मित्र सापडतो.” त्यांनी राहुल गांधींची स्तुती करणारा म्हणत आणखी एक व्यक्ती म्हणून वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचे नाव घेतले आणि हंगेरियन-अमेरिकन गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांचा उल्लेख केला. त्यांनी पुढे लिहिले: आयएनसी म्हणजे इस्लामाबाद नॅशनल काँग्रेस. त्यांनी पुढे आरोप केला की जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यासारख्या विषयांवर काँग्रेस पाकिस्तानच्या बाजूचे प्रतिध्वनी करते. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही काँग्रेसवर टीका करताना म्हटले आहे की, “भारताचे शत्रू राहुल गांधींचा जयजयकार करत आहेत आणि भारतीयांना त्यांची निष्ठा कुठे आहे हे नक्की माहिती आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा