“१ कोटी भारतीयांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता”

मध्य पूर्व संघर्षावर परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन

“१ कोटी भारतीयांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता”

अमेरिका- इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाती देशांमध्ये संघर्ष पेटला असून यामुळे खळबळ उडाली आहे. इराणने एकाच वेळी अनेक देशांवर हल्ले केल्यामुळे तणावाचे वातावरण आहे. या निर्माण झालेल्या संघर्षाला भारताने प्रतिसाद दिला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात मध्य पूर्वेतील समस्या संवाद आणि राजनैतिक मुद्द्यांद्वारे सोडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भारताचे प्रतिसाद पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात भारताच्या प्रतिसादाची रूपरेषा सात मुद्द्यांमध्ये मांडण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, अंदाजे १ कोटी भारतीय आखाती देशांमध्ये आहेत, ज्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गेल्या काही दिवसांत अशा हल्ल्यांमुळे काही भारतीय नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत किंवा बेपत्ता आहेत असेही निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version