निवडणुकीनंतर पहिल्याच भाषणात तारिक रहमान यांनी भारत संबंधांवर काय म्हटले?

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी लवकरच बांगलादेशमध्ये सरकार स्थापन करणार

निवडणुकीनंतर पहिल्याच भाषणात तारिक रहमान यांनी भारत संबंधांवर काय म्हटले?

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी म्हणजेच बीएनपीला ‘बांगलादेश फर्स्ट’ या अजेंड्यावर निवडणुकीत भरघोस विजय मिळवून देणारे तारिक रहमान यांनी शनिवारी भारतासोबतच्या भविष्यातील संबंधांबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली. बीएनपीच्या निर्णायक विजयानंतरच्या पहिल्या भाषणात रहमान म्हणाले की, बांगलादेशचे “हित” हे भारतासोबतच्या त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा आधार असेल.

“बांगलादेश आणि तेथील जनतेचे हित आमचे परराष्ट्र धोरण ठरवेल,” असे बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता असलेले रहमान म्हणाले. बीएनपी सरकार भारत, चीन आणि पाकिस्तानसारख्या प्रादेशिक शक्तींशी संतुलित संबंध राखेल आणि कोणत्याही देशाला आपला ‘गुरू’ (master) मानणार नाही.

काही आठवड्यांपूर्वी १७ वर्षांच्या निर्वासनातून परतल्यानंतर रहमान यांनी बांगलादेशातील महत्त्वाच्या निवडणुकीत त्यांचा पक्ष बीएनपीसाठी मोठे बदल घडवून आणले. यानंतर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. रक्तरंजित विद्यार्थी उठावात शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर झालेल्या झालेल्या पहिल्या निवडणुकीत बीएनपीने २९७ पैकी २१२ जागा जिंकल्या आणि कट्टरपंथी जमात-ए-इस्लामी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

हे ही वाचा:

आरटीईअंतर्गत आता १ किमी अंतरातल्या शाळेतच प्रवेश

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

रिलायन्सला अमेरिकेकडून व्हेनेझुएलाचे तेल खरेदीची परवानगी

“शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी राहुल गांधींचे खोटे कथानक”

शुक्रवारी, निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक्सवर पोस्ट करून रहमान यांचे अभिनंदन करणाऱ्या पहिल्या नेत्यांमध्ये होते. काही तासांनंतर, दोन्ही नेत्यांनी फोनवरून संपर्क साधला. “भारत लोकशाही, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील. आमचे बहुआयामी संबंध मजबूत करण्यासाठी आणि आमची समान विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे,” असे पंतप्रधान मोदींनी पोस्ट केले.

Exit mobile version