33 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरराजकारणप्रदूषणावरील चर्चेतून विरोधकांनी पळ काढला

प्रदूषणावरील चर्चेतून विरोधकांनी पळ काढला

सभागृहात गोंधळ घातला : किरेन रिजिजू

Google News Follow

Related

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी शुक्रवारी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, सरकार प्रदूषणावर चर्चा करण्यास तयार होते; मात्र काँग्रेसने प्रदूषण महत्त्वाचे नाही असे म्हणत सभागृहात गोंधळ घातला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रदूषणावर संपूर्ण दिवस चर्चा करण्याची आमची तयारी होती, पण काँग्रेसने इतर पक्षांना भडकवून सभागृहाच्या वेलमध्ये उतरून अराजकता व व्यत्यय निर्माण केला. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

ते म्हणाले, “या अधिवेशनात मंजूर झालेले विधेयक कोट्यवधी लोकांचे जीवनमान सुधारण्यास आणि भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्यात मोठी भूमिका बजावतील. ‘वंदे मातरम्’वर सविस्तर चर्चा करून आम्ही पुन्हा एकदा देशभक्तीची भावना अधिक बळकट केली आहे. अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते; मात्र संसदेच्या दोन्ही सभागृहांत निवडणूक सुधारणांवर झालेल्या चर्चेनंतर सर्व काही स्पष्ट झाले. निवडणूक आयोग आणि निवडणूक व्यवस्थेवर आरोप करणारेही उघडे पडले.” किरेन रिजिजू यांनी सांगितले की, निवडणूक आयोग आणि निवडणूक सुधारणांवर स्वतंत्रपणे चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ होती. यावरून सरकार चर्चा करण्यास किती तयार आहे हे दिसून येते. या चर्चेनंतर कोणताही संभ्रम उरलेला नाही. यासाठी विरोधकांनी सरकारचे आभार मानायला हवेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा..

५० लाख युवकांना मिळणार एआय, सायबर सुरक्षा, क्वांटम तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

करसंकलन ८ टक्क्यांनी वाढून १७ लाख कोटीच्या पुढे

बांगलादेशात टागोरांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्थापन झालेले ‘छायानौत’ भस्मसात

लोकसभेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब, सभेची उत्पादकता १११ टक्के

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले, “२०२५ चे हिवाळी अधिवेशन देशासाठी अतिशय फलदायी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुधारणा-केंद्रित अजेंड्याला गती मिळाली असून, या अधिवेशनाने त्याला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कदाचित अनेकांना याची जाणीव नसेल, पण या अधिवेशनात मंजूर झालेली विधेयके कोट्यवधी लोकांचे जीवनमान उंचावतील आणि भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्यात योगदान देतील.” ते पुढे म्हणाले, “लोकांनी मनरेगाला लूट आणि भ्रष्टाचाराचे साधन बनवले होते. ते दुरुस्त करण्यासाठी ‘विकसित भारत : जी राम जी’ हे विधेयक आणण्यात आले. या विधेयकामुळे ग्रामीण भारतात क्रांती घडेल. तरीदेखील विरोधकांनी सातत्याने याला विरोध केला. यावरून विरोधक हे मजूरविरोधी असल्याचे स्पष्ट होते.” ते ठामपणे म्हणाले, “‘वंदे मातरम्’वर व्यापक चर्चा करून आम्ही पुन्हा एकदा देशभक्तीची भावना अधिक दृढ केली आहे. विरोधक प्रत्येक विधेयकाला विरोध करत असल्याचे दिसते, ज्यावरून त्यांचे काम केवळ जनतेला भ्रमित करण्याचेच असल्याचे वाटते.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा