25 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरराजकारणतुमचे १२ वाजले आहेत काय?

तुमचे १२ वाजले आहेत काय?

Google News Follow

Related

भाजपा नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्याच्या आरोपावर आशिष शेलार यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? स्वतःचं राजकारण सुरू आहे, अशी टीका शेलारांनी केली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय भाषा वापरली जात आहे? रोज १२ , १२ ची टिमकी काय लावली आहे? तुमचे १२ वाजले आहेत काय? अशी प्रश्नांची सरबत्ती शेलारांनी केली.

भुताने जर फाईल पळवली असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, भाजपा तर काही करत नाही, पण भाजपाने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला भारी पडेल हे सुद्धा संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

हे ही वाचा:

शरद पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास गंभीर परिणाम

मुख्यमंत्र्यांचे ज्ञान, अज्ञान की वाफा?

लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या

गेल्यावर्षी ६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत वक्तव्य केलेले नाही. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे १२ आमदारांच्या नावाचा यादी मागितली होती. मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावरुन राजकारण सुरु झाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा