33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारणमहाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Google News Follow

Related

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे आमदारांसोबत सुरतमार्गे आसाममधील गुवाहाटीला दाखल झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष मिळून असे ४६ आमदार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. यादरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं धक्कादायक विधान समोर आलंय.

सध्या महाराष्ट्राचे ४६ आमदार आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. आमदारांचा हा आकडा आणखी वाढेल असं, एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की, नाही हे मला माहीत नाही. इतर राज्यातील आमदारही आसाममध्ये येऊन राहू शकतात, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकतं. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडं कोणतीही माहिती नाही, असंही म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

… तर मविआतून बाहेर पडू- राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जर्मनी, युएई दौऱ्यावर

मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत

शिवसेनेकडे उरले फक्त १४ आमदार

गुरुवार,२३ जून रोजी एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात शिवसेनेचे तीन आणि अपक्ष दोन आमदार सामील झाले. सध्या हॉटेलमध्ये शिंदे यांच्यासोबत ४६ आमदार आहेत, त्यापैकी ३७ शिवसेनेचे आहेत तर ९ आमदार अपक्ष आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा