24 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरराजकारण'ना माणसं, ना कुटुंब त्यामुळे उद्धव ठाकरे हताश'

‘ना माणसं, ना कुटुंब त्यामुळे उद्धव ठाकरे हताश’

आमदार अतुल भातखळकरांनी केली टीका

Google News Follow

Related

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना चिन्ह आणि नाव दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपल्याला सापत्न वागणूक दिली गेल्याचे म्हटले आहे. त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी तिखट शब्दांत टीका केली आहे.

आमदार भातखळकर यांनी टीव्ही वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, उद्धव ठाकरे गट हा हताश झालेला आहे. त्यांनी तीन तीन वेळा कागदपत्र सादर करायला मुदतवाढ मागितली. यांनी मुदतवाढ कशाला घेतली तर खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यासाठी त्यांना हा वेळ हवा होता. निवडणूक आयोग हा कायद्याप्रमाणे वागत आहे, ती घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयोग चिन्ह, फाटाफूट याबाबतीत अनेक निर्णय दिले. उद्धव ठाकरे यांना मूळ शिवसेनेतून बाहेर पडावे लागले ही काय पहिली घटना नाही. १९६९, १९७८ ला काँग्रेसमध्येही फूट पडली. आणि निवडणूक आयोगाने दिलेले निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरले आहेत. आता त्यांच्यापाशी माणसे नाहीत, कुटुंबातीलही कुणी नाही. त्यामुळे रडीचा डाव खेळत आहेत. स्वतःची कातडी वाचविण्यासाठी घटनात्मक संस्थांची निंदानालस्ती बदनामी करत आहेत. त्यामुळे घटनात्मक संस्थेवर अशी चिखलफेक केल्याबद्दल खरे तर केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला पाहिजे किंवा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून त्याची दखल घेतली पाहिजे. घटनात्मक संस्थांवर हे कसे काय आरोप करू शकतात.

 

कुठलाही पुरावा न देता हेत्वारोप करत आहेत. त्यामुळे या देशातल्या घटनात्मक संस्थआंचे अवमूल्यन करत आहेत, लोकांच्या मनात या संस्थांविषयी अनादर निर्माण करत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर खटला दाखल केला पाहिदे असे माझे मत आहे, असेही आमदार भातखळकर म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा