32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरराजकारण‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे’

‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे’

Google News Follow

Related

गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी आंदोलन अद्याप सुरू आहे. राज्य सरकारने यावर कारवाई म्हणून कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरू केले आहे. यावरून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर घेत हाच का तुमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असा सवाल विचारला आहे.

‘ऐन दिवाळीत दोन हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचे पाप सरकारने केले आहे.’ असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘नोकरी घालवणे, उपाशी मारणे, बेघर करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे हाच महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का?’ असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. ‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे. निलंबन सरकारचा धिक्कार असो!’ असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

शांततेत सुरू असलेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाने आक्रमक भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत असून आज एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे नम्र आवाहन देखील केले आहे. मात्र, विलिनीकरणाची प्रमुख मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही यावर कर्मचारी ठाम आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा