नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या प्रकरणानंतर देशभर उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, असा मोठा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले की, दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्या वेळी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला आणि परिस्थिती हाताळण्यावर भर देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा न देता जबाबदारी सांभाळणे सुरू ठेवले, असा दावा विजयवर्गीय यांनी केला.
हे ही वाचा:
केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला पदभार
नेपाळचा नवा एक रुपयाचा नाणे वादाच्या भोवऱ्यात
चीनचे मनसुबे नापास होतोय ‘शिंकू ला पास’
आता पंजाबच्या शिक्षणमंत्र्याचा हवाय राजीनामा!
नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर देशभर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. विविध विद्यार्थी संघटना आणि आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सातत्याने आंदोलन छेडले होते. या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता.
अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक पूर्ण झाली. त्यांच्या राजीनाम्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच कैलास विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत घडामोडींवरही चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या सुरुवातीलाच राजीनाम्याचा विचार झाला होता, हा दावा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून विरोधकांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
