30 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरराजकारणशशी थरूर यांनी आणीबाणीच्या क्रूर काळाची करून दिली आठवण

शशी थरूर यांनी आणीबाणीच्या क्रूर काळाची करून दिली आठवण

मल्याळम वर्तमानपत्रात लिहिला लेख

Google News Follow

Related

काँग्रेसचे खासदार शशि थरूर पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या विरोधात उभे राहिले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर आणीबाणीसंदर्भात टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, आणीबाणीत शिस्त आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली क्रूरता करण्यात आली. आणीबाणीला भारताच्या इतिहासातील केवळ काळा अध्याय म्हणूनच पाहू नये, तर त्यातून मिळालेला धडा पूर्णपणे समजणे गरजेचे आहे. त्यांनी आणीबाणीत इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या कामांवर प्रश्न उपस्थित केले.

एका मल्याळम वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखात काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीच्या काळ्या कालखंडाची आठवण करून दिली. त्यांनी म्हटले की, शिस्त आणि सुव्यवस्थेसाठी करण्यात आलेले प्रयत्न क्रूरतेमध्ये बदलले, जे योग्य ठरवता येणार नाहीत.

काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य शशि थरूर म्हणाले की, इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी यांनी जबरदस्तीने नसबंदी मोहीम राबवली. ही आणीबाणीतील एक चुकीची उदाहरण बनली. ग्रामीण भागात मनमानी लक्ष्ये गाठण्यासाठी हिंसाचार आणि जबरदस्ती करण्यात आली. नवी दिल्लीसारख्या शहरांमध्ये झोपड्या निर्दयपणे पाडल्या गेल्या आणि त्या साफ करण्यात आल्या. हजारो लोक बेघर झाले. त्यांच्या कल्याणाकडे लक्ष दिले गेले नाही.

हे ही वाचा :

पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान मोदी भारतात परतले! 

गुरुपौर्णिमा विशेष : भगवा ध्वज रा.स्व. संघाच्या गुरूस्थानी

”मी हिंदू आहे” कावड मार्गावरील दुकानांवर झळकले पोस्टर्स!

केजरीवालांना नोबेलची इच्छा, भाजपा म्हणाली- भ्रष्टाचारासाठी कसला नोबेल? 

ते म्हणाले की, लोकशाहीला कमकुवत लेखू नये. ही एक मौल्यवान परंपरा आहे. जिला सतत जोपासणे आणि जपणे आवश्यक आहे. ती जगभरातील लोकांसाठी एक कायमची आठवण म्हणून राहावी. आजचा भारत १९७५ चा भारत राहिला नाही. आपण अधिक आत्मविश्वासी, अधिक विकसित, आणि अनेक बाबतीत अधिक मजबूत लोकशाही आहोत. तरीसुद्धा, आणीबाणीतील धडे अजूनही चिंताजनक पद्धतीने समोर येत असतात.

थरूर म्हणाले की, सत्ता केंद्रीकृत करण्याचा, विरोध दडपण्याचा, आणि घटनात्मक सुरक्षा उपायांना चिरडून टाकण्याचा मोह वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा उद्भवू शकतो. अनेकदा अशा प्रवृत्तींना राष्ट्रीय हित किंवा स्थिरतेच्या नावाखाली योग्य ठरवले जाते. त्या दृष्टिकोनातून, आणीबाणी हा एक गंभीर इशारा आहे. लोकशाहीच्या रक्षकांनी नेहमी जागरूक राहणे आवश्यक आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा