पार्लमेंटच्या शीतकालीन अधिवेशनात १२ राज्यांमध्ये झालेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) च्या मुद्द्यावर सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी स्पष्ट केले की, मतदार याद्यांचे शुद्धीकरण या विषयावर चर्चा करण्यास ते तयार नाहीत. मात्र, सरकारने ९ डिसेंबरला निवडणूक सुधारणा या विषयावर व्यापक चर्चा घेण्याची तयारी दाखवली आहे.
सरकारच्या सूत्रांनी सांगितले, “एसआयआर वर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. विरोधकांनी आंदोलन सुरूच ठेवले तर आम्ही आमचे विधेयक पुढे नेत राहू.”
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ‘एक्स’ वर सांगितले की राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या १५० व्या वर्षानिमित्त चर्चा सोमवारी लोकसभेत होईल आणि त्यानंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता निवडणूक सुधारणांवर चर्चा घेतली जाईल.
हे ही वाचा:
“हनुमान अविवाहितांचे देव!” रेवंत रेड्डी हिंदू देवतांविषयी पुन्हा बरळले
काशी तमिळ संगम : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची भावना बळकट
त्रिपुरातून बाहेर जाताहेत अवैध स्थलांतरित
सूत्रांनी इंडिय टुडे टीव्हीला सांगितले की सरकारने प्रथम वंदे मातरमच्या १५० वर्षांच्या चर्चेला प्राधान्य देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कारण या उत्सवाची तारीख ७ नोव्हेंबर असल्याने चर्चा आधी घ्यावी, असे सरकारने विरोधकांना सांगितले.
मात्र, विरोधकांनी आधी निवडणूक सुधारणांवर चर्चा घेण्याचा आग्रह धरला आणि त्यानंतर वंदे मातरमवरील चर्चा घ्यावी, अशी मागणी केली.
पहिल्या दोन दिवसांपासून संसदेत जवळपास कामकाज कोलमडले आहे, कारण विरोधक एसआयआर आणि कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडलेल्या अनेक ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) च्या मुद्यांवर तातडीने चर्चा करण्याचा दबाव आणत आहेत.
दुसऱ्या दिवशी, राज्यसभेत विरोधकांनी एसआयआरवर तातडीच्या चर्चेची मागणी पुन्हा केली, ज्यामुळे तणाव आणि गोंधळ निर्माण झाला.
केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी सांगितले की, ते विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील वाट ठरवतील. अनेक विरोधी खासदार सभागृहाच्या मध्यभागी उतरले आणि घोषणा देऊ लागले. सरकारने मात्र नियम पाळण्याचे आणि चर्चा सुरू करण्यापूर्वी औपचारिक बैठक घेण्याचे आवाहन केले.
रिजिजूंनी संयम ठेवण्याचे आवाहन करत म्हणाले, “मी कालही सांगितले होते, कोणत्याही गोष्टीवर वेळेची अट लावू नका.” संसदीय प्रक्रियेत शिस्तबद्ध चर्चेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
ते म्हणाले, “देशात अनेक मुद्दे आहेत. एका मुद्द्याला कमी लेखून दुसरा मुद्दा वर नेऊ नये. सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत.”
विरोधकांचा रोष पाहून त्यांनी म्हटले, “तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही, जनता तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, म्हणून तुम्ही सभागृहात राग काढता. हे योग्य नाही.” त्यांनी पुन्हा सांगितले की सरकार चर्चा करण्यास तयार आहे, पण आधी औपचारिक बैठक होणे आवश्यक आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एसआयआरमुळे अधिकाऱ्यांवर वाढलेल्या ताणाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की २८ बीएलओ अधिकाऱ्यांचा कामाच्या ओझ्यामुळे मृत्यू झाला आहे.
खर्गे म्हणाले, “हा तातडीचा विषय आहे. आम्हाला आत्ताच चर्चा हवी आहे. लोकशाही, नागरिक आणि देशाच्या हितासाठी तुम्ही एसआयआरवर चर्चा होऊ द्या. आम्ही पूर्ण सहकार्य करू.”
दिवसभरात, जसेच शासकीय कागदपत्रे सभागृहात मांडली गेली, तसेच विरोधकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. काही सदस्य मध्यभागी गेल्यावर, राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांनी हस्तक्षेप करून त्यांना जागेवर परत जाण्याचे निर्देश दिले.







