31 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरराजकारणओबीसी आरक्षणावर शरद पवारांची टोलवाटोलवी सुरूच

ओबीसी आरक्षणावर शरद पवारांची टोलवाटोलवी सुरूच

Google News Follow

Related

ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारच्या हाती काहीही नाही, केंद्रानेच पावले उचलली पाहिजेत, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान घेतला आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा काढून टाका, इम्पिरिकल डाटा द्या, जातीनिहाय जनगणना करा, अशा तीन मागण्या पवारांनी केंद्राकडे केल्या.
केंद्राने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात घटनेतील १२७वी घटनादुरुस्ती करत ओबीसी संदर्भातील विधेयक मंजूर केले. पण ते पवारांना नामंजूर आहे.

सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी केंद्रावर जबाबदारी ढकलली. ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी केंद्राने राज्यांना ओबीसी आरक्षणासंदर्भात यादी तयार करण्यास सांगितले. आरक्षण हे राज्य सरकार देणार असल्याचे दाखवले जात आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही. त्यासाठी ही मर्यादा काढून टाकण्याची जबाबदारी पवारांनी केंद्र सरकारवर टाकली. त्यासाठी जनमत तयार करण्याची तयारीही त्यांनी केली आहे. जेवणाचे ताट समोर आहे, पण हात बांधलेले आहेत, अशी स्थिती झाली असल्याचे ते म्हणाले.

५० टक्क्यांपेक्षा अनेक राज्यात अधिक आरक्षण आहे. महाराष्ट्रातही ते आहे. तेव्हा ते काढून टाका, अशी पवारांची मागणी असून इम्पिरिकल डाटाही केंद्रानेच राज्याला द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. शिवाय, जातीनिहाय जनगणनेची मागणीही पवारांनी केली.

याबाबत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी चिमटा काढला की, केंद्र सरकारने कितीही घटना दुरुस्ती केल्या तरी आम्हाला मराठ्यांना आणि ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही.
एकूणच ओबीसींच्या बाबतीत शरद पवार यांची नकारघंटा वाजतेच आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा