28 C
Mumbai
Thursday, December 25, 2025
घरराजकारणसीतामढीत विरोधकांवर गरजले पंतप्रधान

सीतामढीत विरोधकांवर गरजले पंतप्रधान

म्हणाले पहिल्या टप्प्यात जंगलराजवाल्यांना ६५ व्होल्टचा बसला झटका

Google News Follow

Related

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सीतामढी येथे झालेल्या निवडणूक सभेत महागठबंधनावर तीव्र प्रहार केला. पंतप्रधान म्हणाले, “पहिल्या टप्प्यातील मतदानात बिहारने कमाल केली आहे. जंगलराजवाल्यांना ६५ व्होल्टचा झटका बसला आहे. चारही बाजूंनी एकच चर्चा आहे. बिहारच्या तरुणांनी विकासाला मत दिलं आहे, एनडीएला निवडलं आहे. बिहारच्या बहिणींनी आणि मुलींनी एनडीएच्या विक्रमी विजयानं शिक्कामोर्तब केलं आहे.”

“नको कट्टा सरकार, पुन्हा एकदा एनडीए सरकार” मोदी म्हणाले, “आज सीतामढीमध्ये दिसणारे वातावरण हृदयाला स्पर्शून जाणारे आहे. हे वातावरणच सांगते, ‘नको कट्टा सरकार, पुन्हा एकदा एनडीए सरकार.’ तुम्ही लोकांनी अनेक नेत्यांची झोप उडवली आहे, आणि हाच तर जनतेचा खरा अधिकार आहे.” ते पुढे म्हणाले, “मी आज माता सीतेच्या या पवित्र भूमीवर आलो आहे, हे माझं मोठं सौभाग्य आहे. मला अगदी ८ नोव्हेंबर २०१९ ची तारीख आठवते त्याच दिवशी मी या भूमीवर आलो होतो. दुसऱ्या दिवशी मला पंजाबमधील करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी जावं लागलं होतं. आणि त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्या प्रकरणावर निकाल येणार होता. मी मनोमन प्रार्थना केली होती की माता सीतेच्या आशीर्वादाने निर्णय रामललांच्या बाजूने यावा. आणि तसंच झालं. सुप्रीम कोर्टाने रामललांच्या बाजूनेच निकाल दिला.”

हेही वाचा..

“बालसुलभ नेत्यांच्या” प्रभावाखाली येणार नाही बिहारची जनता

भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर लवकरच सहमतीची दिशा

प्रामाणिकपणा, देशभक्तीच्या मूल्यांवर ठाम राहण्याची प्रेरणा आडवाणींनी दिली

मिरचीची पूड फेकणाऱ्या चोरट्या महिलेला सोनाराने १७ थपडा मारल्या

“माता सीतेच्या आशीर्वादाने विकसित बिहार घडेल” मोदी म्हणाले, “आज मी पुन्हा या पवित्र भूमीवर आलो आहे, तुमचा आशीर्वाद घेत आहे. इतक्या उत्साही लोकांमध्ये ते दिवस आठवणं स्वाभाविक आहे. माता सीतेच्या आशीर्वादानेच बिहार विकसित बिहार बनेल. हा निवडणूक काळ ठरवेल की येत्या वर्षांत बिहारच्या मुलांचं भविष्य काय असेल. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत निर्णायक आहे.”
सभा संबोधित करताना मोदी म्हणाले, “राजद बिहारच्या मुलांसाठी काय विचार करत आहे, हे त्यांच्या प्रचारसभांमध्येच दिसून येतं. तुम्ही फक्त त्यांचे गाणे आणि नारे ऐका — अंगावर काटा येईल. त्यांच्या मंचांवर लहान मुलांना शिकवून घेतलं जातं की ते ‘रंगदार’ बनू इच्छितात. पण बिहारचं मूल आता ‘रंगदार’ नाही बनणार — आमचं मूल इंजिनिअर बनेल, डॉक्टर बनेल, वकील बनेल, न्यायाधीश बनेल.”
विरोधकांवर निशाणा साधत मोदी म्हणाले, “जंगलराज म्हणजे कट्टा, क्रूरता, कटुता, कुसंस्कार आणि करप्शन. हे लोक कुशासन आणू इच्छितात. भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांसारख्या महान नेत्यांनी बिहारला सामाजिक न्याय आणि विकासाचं स्वप्न दिलं होतं, पण जंगलराज आल्यावर बिहारमध्ये अध:पतनाचा काळ सुरू झाला. राजदने विकासाचं संपूर्ण वातावरणच नष्ट केलं.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा