23 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारणराहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच

राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच

आपल्या कुटूंबाची ईडी मार्फत चौकशी सुरू केल्यानंतर लोकशाहीची कशी हत्या झाली आहे असा सूर आळवायला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरूवात केली आहे.

Google News Follow

Related

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर आज, ५ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली.

“भारतातील लोकशाहीची सध्या हत्या सुरु आहे. चार लोकांची इथे हुकुमशाही सुरु आहे. काँग्रेसने इतक्या वर्षात जे गमावलं आहे ते भाजपाने गमावलं आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. देशातल्या बेरोजगारीवर, महागाईवर संसदेत चर्चा होत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. वास्तविक चित्र वेगळंच आहे आणि दाखवलं वेगळंच जात आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.

“देशातल्या समस्यांबद्दल बोलायला गेलं की सीबीआय आणि ईडी मागे लावली जाते. कोरोना काळात भारताने चांगली कामगिरी केल्याचे केंद्र सरकार सांगते मात्र युनायटेड नेशन्सने दिलेली मृतांची आकडेवारी खोटी असल्याचं सांगितलं जात. वाढत्या महागाईचे आकडे अर्थ मंत्र्यांना दिसत नाहीत का?,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

हे ही वाचा:

थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी

पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ल्यात मजुराचा मृत्यू

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे उपस्थित होते. “देशात ईडीची दहशत असल्याची टीका अशोक गेहलोत यांनी केली आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जात आहे. माध्यमांनी धैर्य दाखवूनपुढे यायला हवे. आज जर गप्प बसलो तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही,” अशी टीका त्यांनी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा