हे ही वाचा:
या नियमावरून गदारोळ झाला. आताच हा नियम कसा केला गेला, त्यामागे कोणते कारण आहे असा सवाल विचारण्यात आला. त्याबद्दल निवडणूक आयुक्तांनी सदर स्पष्टीकरण दिले.
उमेदवाराच्या समर्थकांकडून मतदानाच्या आदल्या दिवशी कथितपणे वाटल्या जाणाऱ्या पैशांविषयी निवडणूक आयोगाची भूमिका काय असे विचारल्यावर. यावर बोलताना, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आचारसंहितेच्या नियमाबाबत सांगितले. पैसे घरोघरी वाटण्याच्या ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या महापालिका आयुक्तांना पाठवतो. ते या तक्रारीचं निराकरण करतात, असे दिनेश वाघमारे यांनी सांगितले. तसेच साडेपाच वाजल्यानंतर जाहीर प्रचार करता येणार नाही. त्याबाबतचा नियम आहे. कलम ३७ नुसार पाच लोकं एकत्र येऊ शकत नाही. पण व्यक्तिगत कोणी एकमेकांच्या घरी गेला तर अडचण नाही, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
.
