31 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
घरराजकारण"उद्धव ठाकरेंची मनस्थिती निबर" - भाजपा नेत्याचा हल्लाबोल

“उद्धव ठाकरेंची मनस्थिती निबर” – भाजपा नेत्याचा हल्लाबोल

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनस्थिती निबर आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून करण्यात आला आहे. राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांवर ही टीका करण्यात आली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सुरवातीपासूनच घेतलेल्या ‘वेट अँड वॉच’ भूमिकेवरून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

पुण्यात घडलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा उलगडा होत नसताना, या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिल्याची चर्चा जरी असली तरी त्यावर अजून कोणीही अधिकृत शिक्कमोर्तब केलेले नाही. दरम्यान संजय राठोड यांच्या विषयात मुख्यमंत्र्यांची द्विधा मनस्थिती असल्याचे वृत्त एका वर्तमानपत्राने दिले आहे. यावरूनच भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

हे ही वाचा:

या देशातील मदरशांवर आता सरकारची करडी नजर….

“युतीला मिळालेला जनमताचा कौल डावलून लाचारीने मुख्यमंत्री पद लाटताना फक्त द्विधा मन:स्थिती नव्हती” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंची मनस्थिती द्विधा नसून निबर आहे असेही भातखळकरांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

नवनीत राणांना ॲसिड हल्ल्याची धमकी, संजय राऊतांवर संशय

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा