अल्पसंख्याक बहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भरतपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार हुमायूं कबीर यांना तृणमूल काँग्रेसने गुरुवारी निलंबित केले. अलीकडेच त्यांनी बेलडांगा (याच जिल्ह्यात) येथे बाबरी मशीद बांधण्याची योजना जाहीर केली होती. पश्चिम बंगालचे नगर व्यवहार व शहरी विकास मंत्री आणि कोलकाता महानगरपालिकेचे (केएमसी) महापौर फिरहाद हकीम यांनी सांगितले की, कबीर यांच्या अलीकडील कृतींमध्ये धार्मिक उन्मादासोबतच राजकीय हेतूंची झलक दिसली. हे पक्षशिस्तीचे गंभीर उल्लंघन असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
हकीम म्हणाले, “पक्षाचा कबीर यांच्याशी आता कोणताही संबंध राहणार नाही. बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करून त्यांनी १९९२ मधील बाबरी मशिदीच्या वास्तविक घटनेच्या कटू आठवणी पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला वाटते की त्यांच्या कृतींमध्ये भाजपाचा पाठींबा आहे आणि विभाजनकारी राजकारणाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.” निलंबनाच्या निरयावर प्रतिक्रिया देताना कबीर म्हणाले की, शुक्रवारी ते आपला राजीनामा देतील. मात्र, ते पक्षातून की आमदारकीतून किंवा दोन्ही ठिकाणाहून राजीनामा देतील, हे स्पष्ट केले नाही.
हेही वाचा..
ऑटोमोबाईल उद्योगाचे भविष्य उज्ज्वल
ऑटोमोबाईल उद्योगाचे भविष्य उज्ज्वल
ऑटोमोबाईल उद्योगाचे भविष्य उज्ज्वल
सीपी राधाकृष्णन यांनी नियम २६७ च्या व्याप्तीवर दिले स्पष्टीकरण
कबीर म्हणाले, “हकीम यांनी जे म्हटले त्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. मी उद्या माझा राजीनामा देईन.” याआधीच, कलकत्ता हायकोर्टाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश सुजॉय पॉल यांच्या अध्यक्षतेखालील एक खंडपीठासमोर एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. बेलडांग्यात बाबरी मशीद बांधण्याच्या कबीर यांच्या घोषणेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. बेलडांगा येथे प्रस्तावित बांधकामासाठी सांगण्यात आलेल्या जमिनीवरूनही वाद निर्माण झाला आहे. त्या जमिनीचे मालक—मुर्शिदाबाद येथील एक शेतकरी—यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की ते जमीन ना विकणार, ना त्या जमिनीवर बाबरी मशीद उभी करू देणार. त्यांनी त्या मालमत्तेला चारही बाजूंनी चारदिवारी बांधून टाकले आहे. यावर प्रतिक्रिया देताना कबीर यांनी आव्हान दिले की, गरज पडल्यास ते “आपले प्राणही देऊन” बाबरी मशीद बांधण्याचा निर्धार पूर्ण करतील.







