26 C
Mumbai
Friday, January 30, 2026
घरराजकारणराजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही

राजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही

Google News Follow

Related

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज हजारोंच्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आला आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याच्या प्रयोगाच्या घोषणेमुळे सरकारचा तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्वीट करून टोपेंना लक्ष्य केले आहे.

हे ही वाचा:

‘पोयला बौशाख’ निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

कोरोनाची चेन वाढतच आहे

कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू

राज्यात काल ११ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यु झाला. राज्यावर ऑक्सिजनचे संकट गहिरे झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना हवेतून ऑक्सिजन घेऊन त्याचे शुद्धीकरण करून मग वापरण्याची कल्पना सुचली. आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावर मंत्र्यांवर टिका केली आहे. ते ट्वीट मध्ये म्हणतात,

राज्य व्हेंटिलेटरवर असले तरी मंत्री महोदयांचा प्रसिद्धीचा सोस काही कमी होत नाही. अशा घोषणा करून टाळ्या घेताना हे शहाणपण आग लागे पर्यत का सुचले नाही याचे उत्तर द्या राजेश टोपे

राज्यात सध्या व्हेंटिलेटर सोबतच ऑक्सिजनेटेड बेड्स, साधे बेड्स रेमडेसिवीर इत्यादींचा प्रचंड तुटवडा आहे. राज्यातून या औषधाला खूप मागणी आहे. परंतु ठाकरे सरकारकडून याबाबत अत्यंत धीम्या गतीने कारवाई होताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर चहूबाजूने टीका होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. किमान त्यांना सुचलं तरी.
    नुसती टीका करण्यापेक्षा आपल्या भागात शताब्दी रुग्णालय येते तिथे असा काही प्रयोग करता येईल का याचा जरूर विचार करावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा