27 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरस्पोर्ट्सआयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डचा बुरखा फाडला; नेमकं प्रकरण काय?

आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डचा बुरखा फाडला; नेमकं प्रकरण काय?

बीसीबीचे सल्लागार आसिफ नझरूल यांचे दावे फेटाळले

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने २०२६ टी- २० विश्वचषकाबाबत बांगलादेशकडून करण्यात आलेल्या सुरक्षा दाव्यांवर कठोर भूमिका घेत त्यांना स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. आयसीसीच्या या खंडनामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) चे सल्लागार आणि क्रीडा विषयांचे प्रमुख मानले जाणारे आसिफ नझरूल यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत आसिफ नझरूल यांनी दावा केला होता की, भारतात होणाऱ्या २०२६ टी- २० विश्वचषकादरम्यान बांगलादेशी खेळाडू आणि चाहत्यांच्या सुरक्षेबाबत आयसीसीने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. नझरूल यांनी असेही म्हटले होते की. आयसीसीकडून करण्यात आलेल्या सुरक्षा पुनरावलोकनामुळे भारतविरोधी भूमिकेला दुजोरा मिळतो. मात्र, आयसीसीने तत्काळ निवेदन जारी करून स्पष्ट केले की बांगलादेश क्रिकेट बोर्डला असा कोणताही आढावा देण्यात आलेला नाही.

आयसीसीने आपल्या अधिकृत उत्तरात ठामपणे सांगितले की २०२६ टी- २० विश्वचषक ठरलेल्या वेळापत्रकानुसारच आयोजित केला जाईल. गव्हर्निंग बॉडीनुसार, भारतातील स्पर्धेसाठी एकूण सुरक्षा धोका “कमी ते मध्यम” श्रेणीत आढळला आहे, जो मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी सामान्य मानला जातो. आयसीसीच्या मते, जोखीम मूल्यांकनात बांगलादेश संघ, त्यांचे अधिकारी किंवा भारतातील कोणत्याही सामना स्थळावर लक्ष केंद्रित करणारा कोणताही ठोस किंवा थेट धोका ओळखला गेलेला नाही.

सोमवारी झालेल्या ब्रीफिंगमध्ये आसिफ नझरूल यांनी कथितरीत्या आयसीसीच्या निष्कर्षांचा संदर्भ देत म्हटले, “आम्ही आयसीसीला दोन पत्रे पाठवली, त्यानंतर त्यांच्या सुरक्षा पथकाने उत्तर दिले. पुढे त्यांनी दावा केला, जर तीन गोष्टी घडल्या तर बांगलादेश संघासाठी धोका वाढेल, असे त्यांनी सांगितले. मुस्तफिजुर रहमानला संघात सामाविष्ट केले गेले, समर्थक सार्वजनिक ठिकाणी बांगलादेशची राष्ट्रीय जर्सी घालू लागले आणि बांगलादेशमध्ये निवडणुका जवळ आल्या, तर संघासाठी धोका वाढेल. या कथित टिप्पण्यांच्या आधारे नझरूल यांनी असे म्हटले की भारतातील वातावरण बांगलादेश संघासाठी सुरक्षित नाही, याचा हा पुरावा आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, आयसीसी जर बांगलादेशकडून प्रमुख गोलंदाजाला बाहेर ठेवण्याची, चाहत्यांनी जर्सी न घालण्याची किंवा निवडणूक कालमर्यादेबाबत अपेक्षा ठेवत असेल, तर ते विचित्र आणि अवाजवी आहे.

हे ही वाचा..

‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे त्रि-सेवा सहकार्याचे सर्वोत्तम उदाहरण!

बांगलादेशात २८ वर्षीय हिंदू रिक्षा चालकाची हत्या

बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या हिंदू नेत्याचा पोलिस कोठडीत मृत्यू

खामेनी विरोधी निदर्शनांमधील सहभागानंतर २६ वर्षीय तरुणाला फाशीची शिक्षा

आयसीसीकडून करण्यात आलेल्या कडक खंडनानंतर नझरूल यांची विधाने तथ्यांच्या विरोधात असल्याचे मानले जात आहे. आयसीसीने पुन्हा एकदा स्पष्ट केले की त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही आणि सर्व सहभागी देशांनी ठरवलेल्या सहभागाच्या अटी पूर्ण कराव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा